शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

बाळा दुग्ध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही! भाग २

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 7, 2020 18:06 IST

प्रत्येकाची सोय देवाने लावून ठेवलेली असते, आपण वृथा अभिमान बाळगू नये.

ज्योत्स्ना गाडगीळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत एक किस्सा सांगितला जातो. रायगडाच्या बांधकामावर देखरेख करत असताना, अत्यंत समाधानाने महाराज सभोवताली पाहत होते. सर्व कामगार, फौज, लवाजमा आणि गडावरून दिसणारा आसमंत पाहून आपल्या स्वराज्य आणि सुराज्याचे आपण पोशिंदे आहोत, हा विचार त्यांना सुखावून गेला. त्याचवेळेस समर्थ रामदास स्वामी, `जय जय रघुवीर समर्थ' म्हणत तिथे आले. त्यांनी महाराजांच्या नजरेतले भाव ओळखले. 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' म्हणून कारागीरांना बोलावून, महाराजांच्या बाजूला असलेला भला मोठा खडक फोडून घेतला. तेवढ्यात एक बेडकी टुनकन उडी मारून खडकातून बाहेर आली. तिच्याकडे बोट दाखवून समर्थ म्हणाले, 'महाराज, आपण धन्य आहात, आपल्या राज्यात या बेडकीणीचेही पालन-पोषण व्यवस्थित होत आहे.' 

महाराज खजिल झाले. त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी ती कबुलही केली. त्यावर समर्थ म्हणाले, 'महाराज, आपण या स्वराज्याचे विश्वस्त आहात, मात्र या चराचराचा पोशिंदा वेगळा आहे. त्यानेच या खडकामधील बेडकीणीला सुखरूप जीवंत ठेवले. तिच्या पोटपाण्याची व्यवस्था केली. म्हणून आपण पोशिंदे आहोत, हा विचार मनातून काढून टाकावा,

तू टाक अहंता राजा। नव्हेशी तू पोशिंदा।।किमयाकर्ता रघुराणा। विश्वंभर पालनकर्ता।।

हेही वाचा: फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

हा प्रसंग खरोखरच घडला की नाही, हा चर्चेचा विषय नसून त्या प्रसंगातील आशय महत्त्वाचा आहे. समर्थांनी केलेला बोध आपणही लक्षात घेण्यासारखा आहे. सणवाराला आपण कोणाला जेवू-खाऊ घालतो, दान-धर्म करतो आणि स्वत:ला लगेचच सर्वेसर्वा समजू लागतो. मात्र तसे समजण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाची सोय देवाने लावून ठेवलेली असते. हेच सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, 

बाळा दुग्ध कोण, करितो उत्पत्ती,वाढवे श्रीपती, सवे दोन्ही।।

मातेच्या गर्भात बाळाचे बीज रोवले गेले, की तो जन्माला येण्याआधीच त्याच्या भूकेची सोय देवाने लावून दिलेली असते. बाळाची वाढ आणि त्याचे पोषण या दोन्हीची जबाबदारी भगवंत पार पाडत असतो आणि आपण गैरसमजूतीत जगतो, की आपण मुलांना लहानाचे मोठे केले. भगवंताखेरीज कोणी कोणाचा सांभाळ करत नसतो. सांभाळण्याची जबाबदारी व्यक्तीपरत्वे भगवंत वाटून देतो, म्हणून आपण त्या कार्याचा हिस्सा होतो. 

आजवर त्याने कोणाचीही उपासमार होऊ दिलेली नाही. चोच दिली, तो चारा देतोच! घरातलेच उदाहरण पाहा. घरात किती जण राहतात, असे विचारले तर आपण घरातल्या व्यक्तींची संख्या सांगतो, परंतु असंख्य जीव आपल्या सोबतीने एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यांचे आपण पालन-पोषण करीत नाही. आपण घरातल्या पाळीव प्राण्यांना वेळच्या वेळी जेवू-खाऊ घालतो, त्यांचे आजारपण काढतो. मात्र, गल्ली-बोळातल्या, राना-वनातल्या प्राण्यांना काय हवे नको ते कोण विचारतो? त्यांची गुजराण कशावर होते, याचा विचार आपल्या मनात डोकावतो का? तरी ती जगतात, कारण त्यांना जगवणारा, त्यांची काळजी घेणारा कैवारी सर्वांवर लक्ष ठेवून असतो. हे विसरून कसे चालेल? म्हणून तुकाराम महाराज विचारतात, 

का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाचि।

क्रमश:

हेही वाचा: संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह