शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

बाळा दुग्ध कोण करीतो उत्पत्ती, वाढवे श्रीपती सवे दोन्ही! भाग २

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 7, 2020 18:06 IST

प्रत्येकाची सोय देवाने लावून ठेवलेली असते, आपण वृथा अभिमान बाळगू नये.

ज्योत्स्ना गाडगीळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत एक किस्सा सांगितला जातो. रायगडाच्या बांधकामावर देखरेख करत असताना, अत्यंत समाधानाने महाराज सभोवताली पाहत होते. सर्व कामगार, फौज, लवाजमा आणि गडावरून दिसणारा आसमंत पाहून आपल्या स्वराज्य आणि सुराज्याचे आपण पोशिंदे आहोत, हा विचार त्यांना सुखावून गेला. त्याचवेळेस समर्थ रामदास स्वामी, `जय जय रघुवीर समर्थ' म्हणत तिथे आले. त्यांनी महाराजांच्या नजरेतले भाव ओळखले. 'अहंकाराचा वारा न लागो राजसा' म्हणून कारागीरांना बोलावून, महाराजांच्या बाजूला असलेला भला मोठा खडक फोडून घेतला. तेवढ्यात एक बेडकी टुनकन उडी मारून खडकातून बाहेर आली. तिच्याकडे बोट दाखवून समर्थ म्हणाले, 'महाराज, आपण धन्य आहात, आपल्या राज्यात या बेडकीणीचेही पालन-पोषण व्यवस्थित होत आहे.' 

महाराज खजिल झाले. त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी ती कबुलही केली. त्यावर समर्थ म्हणाले, 'महाराज, आपण या स्वराज्याचे विश्वस्त आहात, मात्र या चराचराचा पोशिंदा वेगळा आहे. त्यानेच या खडकामधील बेडकीणीला सुखरूप जीवंत ठेवले. तिच्या पोटपाण्याची व्यवस्था केली. म्हणून आपण पोशिंदे आहोत, हा विचार मनातून काढून टाकावा,

तू टाक अहंता राजा। नव्हेशी तू पोशिंदा।।किमयाकर्ता रघुराणा। विश्वंभर पालनकर्ता।।

हेही वाचा: फुटे तरूवर उष्णकाळमासी, 'जीवन' तयासी कोण घाली? (भाग १)

हा प्रसंग खरोखरच घडला की नाही, हा चर्चेचा विषय नसून त्या प्रसंगातील आशय महत्त्वाचा आहे. समर्थांनी केलेला बोध आपणही लक्षात घेण्यासारखा आहे. सणवाराला आपण कोणाला जेवू-खाऊ घालतो, दान-धर्म करतो आणि स्वत:ला लगेचच सर्वेसर्वा समजू लागतो. मात्र तसे समजण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाची सोय देवाने लावून ठेवलेली असते. हेच सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, 

बाळा दुग्ध कोण, करितो उत्पत्ती,वाढवे श्रीपती, सवे दोन्ही।।

मातेच्या गर्भात बाळाचे बीज रोवले गेले, की तो जन्माला येण्याआधीच त्याच्या भूकेची सोय देवाने लावून दिलेली असते. बाळाची वाढ आणि त्याचे पोषण या दोन्हीची जबाबदारी भगवंत पार पाडत असतो आणि आपण गैरसमजूतीत जगतो, की आपण मुलांना लहानाचे मोठे केले. भगवंताखेरीज कोणी कोणाचा सांभाळ करत नसतो. सांभाळण्याची जबाबदारी व्यक्तीपरत्वे भगवंत वाटून देतो, म्हणून आपण त्या कार्याचा हिस्सा होतो. 

आजवर त्याने कोणाचीही उपासमार होऊ दिलेली नाही. चोच दिली, तो चारा देतोच! घरातलेच उदाहरण पाहा. घरात किती जण राहतात, असे विचारले तर आपण घरातल्या व्यक्तींची संख्या सांगतो, परंतु असंख्य जीव आपल्या सोबतीने एकाच छताखाली गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यांचे आपण पालन-पोषण करीत नाही. आपण घरातल्या पाळीव प्राण्यांना वेळच्या वेळी जेवू-खाऊ घालतो, त्यांचे आजारपण काढतो. मात्र, गल्ली-बोळातल्या, राना-वनातल्या प्राण्यांना काय हवे नको ते कोण विचारतो? त्यांची गुजराण कशावर होते, याचा विचार आपल्या मनात डोकावतो का? तरी ती जगतात, कारण त्यांना जगवणारा, त्यांची काळजी घेणारा कैवारी सर्वांवर लक्ष ठेवून असतो. हे विसरून कसे चालेल? म्हणून तुकाराम महाराज विचारतात, 

का रे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाचि।

क्रमश:

हेही वाचा: संस्कृतीचं, मांगल्याचं प्रतीक आहे 'स्वस्तिक'; सकारात्मक ऊर्जा देणारं शुभचिन्ह