शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Travel: गजानन महाराजांचे रत्नागिरीतील सुंदर मंदिर तुम्ही पाहिले आहे का? सविस्तर जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:41 IST

Travel: गण गण गणात बोते, हा सिद्धमंत्र देणारे गजानन महाराज यांचे रत्नागिरीस्थीत सुंदर मंदिर प्रेक्षणीय आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती... 

>> मकरंद करंदीकर 

आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात.

सध्याच्या युगात प्रत्येक जण अनेक प्रश्न, संकटे आणि अडचणीने गांजलेला असतो. त्यावर बहुतेक सामान्य संसारी माणूस हा देवधर्मातून, भक्तीमार्गाने उपाय शोधत असतो. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा भक्त परिवार देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अलीकडे आपण खूप मोठमोठ्या श्रीमंत देवस्थानांमधील गैरप्रकारांबद्दल बातम्या वाचतो. पण गजानन महाराज यांच्या शेगाव येथील देवस्थानचे व्यवस्थापन, स्वच्छता, शिस्त, भक्तमंडळींच्या उत्तम व्यवस्थेची मात्र  आपण खूप चांगली वर्णने ऐकतो. गजानन महाराजांच्या अन्यत्र असलेल्या मंदिरातही तीच शिस्त, स्वच्छता, पारदर्शकता, भक्तांची स्वयंशिस्त आढळून येते.

रत्नागिरी नजिकच्या गोळप या ठिकाणी असलेले गजानन महाराजांचे मंदिर असेच अत्यंत प्रशस्त स्वच्छ आणि भव्य आहे. मंदिराच्या भोवती चारही बाजूंना पाण्याचे छोटे खंदक आहेत. हे मंदिर २०१६ मध्ये सुरू झाले. सकाळी ६ll ते रात्री ७ll पर्यंत हे मंदिर दर्शनार्थ खुले असते. गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद असतो.  

मूळचे या गावातील आणि  मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणारे कै. वसंतराव गोगटे हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मनात या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर  बांधण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या येथील घरात जायला, कोकणातील खालची आळी, वरची आळी या रचनेप्रामाणे जेमतेम पायवाट होती. तरीही १९८६ मध्ये, शेगावची महाराजांची पालखी, हत्ती घोड्यांसह त्यांच्या घरी आली. आता महाराजच येथपर्यंत आले आहेत तर त्यांचे कायमस्वरूपी मंदिर येथे व्हायला हवे, असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले. पण सर्व गोष्टी आणि याचे आर्थिक गणित जमवायचे कसे हा प्रश्न होता. या वसंतराव गोगटे यांना गजानन महाराजांच्या चरित्रावर निघालेल्या दूरदर्शन मालिकेमध्ये, साक्षात गजानन महाराजांचेच काम करण्याची सुसंधी लाभली. हाच गजानन महाराजांचा आदेश आहे, इच्छा आहे असे मानून त्यांनी त्यांना मिळालेले त्याचे सर्व मानधन या कामासाठी दिले व सुरुवात केली. या  प्रचंड खर्चासाठी त्यांचा हा एक अत्यंत पवित्र असा हातभार होता. त्यांचे पुतणे श्री. माधव गोगटे हे आता या मंदिराची व्यवस्था पाहतात. 

 या मंदिराच्या प्रांगणात, गजानन महाराजांची, एक पाय खाली सोडून बसलेल्या सुप्रसिद्ध छबितील, एक प्रचंड म्हणजे सुमारे १८ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. असे कळले की ही मूर्ती खरे तर माहिमच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात बसविण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण तेथे कांहीं तांत्रिक कारणामुळे ते शक्य न झाल्याने, त्या मूर्तीचा स्थानापन्न होण्याचा योग मात्र या गोळपच्या मंदिरात होता हे खरे !  या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन तर अगदी हमरस्त्यावरून जातांना सुद्धा सहजपणे होते. मुख्य मंदिराशेजारी पठण, पारायण, कीर्तन, प्रवचन इत्यादींसाठी एक प्रशस्त सभागृह बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. श्री गजानन महाराजांचे जगभर पोचलेले, 'श्री गजानन विजय ' हे चरित्र लिहिणारे दास गणू महाराज ( सहस्रबुद्धे) यांची मूळ वास्तू आणि विठ्ठल मंदिर रत्नागिरीनजिकच्या   कोतवडे येथे आहे, हा सुद्धा एक योगच म्हणायचा ! इथली  प्रसन्नता आणि पावित्र्य याचा अनुभव घेण्यासारखा आहे.

ll गण गण गणात बोते ll