शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

शेठजींच्या जीवावर उठलेले आजोबा, मुलगा आणि नातू यांची अजब गजब कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 08:00 IST

मुलांनी आपले वागणे सुधारावे असे वाटत असेल तर मोठ्यांनी आपल्या वागण्याकडे लक्ष दिले पाहिजे. वाचा ही गोष्ट!

अलीकडच्या पिढीची मुले कधी, कुठे, काय बोलतील, सांगता येत नाही. मात्र, ती हे सगळे पोटात शिकून येत नाहीत, तर आपलेच शब्द, विचार, कृती ते टिपकागदासारखे टिपत असतात आणि त्याचीच परतफेड आपल्या कृतीतून, उक्तीतून करत असतात. म्हणून बालवयातच त्यांच्या जीभेला चांगले वळण देणे ही आपली जबाबदारी असते. आज आपण जे बोलू, तेच चार दिवसांनी मुलांकडून ऐकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. यासाठीच, बालसंस्कार अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांना बालपणीच जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायला शिकवले पाहिजे. मान दिला, तर मान मिळता़े  अपमान केला, तर अपमान मिळतो. हीच जगाची रित आहे.

एका सराफाला नवसाने एक मुलगा झाला. तो वाईट संगतीला लागून उनाड बनल्यामुळे आईबापाचे बिलकुल ऐकत नसे. आपला परका न पाहता तोंडाला येईल ते बोलावे, सदा खावे, प्यावे आणि वेळ अवेळ न पाहता गावभर हिंडावे, असे तो करीत असे.  

एका दिवाळीच्या दिवशी नगरशेठ दिवाणखान्यातील खुर्चीवर पाय हलवत आराम करत बसले असता, समोरील रस्त्यावरून जात असलेल्या सराफाच्या मुलाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्या शेठचे अगडबंब पोट शरीर पाहून उपहासाने तो सारखा हसू लागला. शेठला वाटले, की आपली श्रीमंती पाहून मुलाला आनंद वाटला असावा. दिपावलीनिमित्त त्याला काहीतरी बक्षिस द्यावे. अशा विचाराने शेठजींनी मुलाला बोलावून घेतले आणि हसण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, `शेठजी खरे सांगू का तुम्हाला? आपले शरीर फारच स्थूल आहे. तुम्हाला जर याक्षणी जागच्या जागी मरण आले, तर खाली नेतेवेळी लोकांनी किती फजिती होईल. या विचाराने हसू आले.

हे ऐकून शेठजी संतापले. त्याला घरात डांबून ठेवले. सायंकाळ झाली, तरी मुलगा घरी न आल्याने सराफाला काळजी वाटू लागली. सराफ चौकशी करत करत शेठजींच्या घरी पोहोचला. शेठजींना मुलाचा जाब विचारला. शेठजींनी खरे कारण सांगून मुलाला डांबून ठेवल्याची कबुली दिली. सराफातला बाप जागा झाला. तो मुलाची वकिली करू लागला. `शेठजी, मुलांचे बोलणे कुठे मनावर घेता, त्यांना कुठे अक्कल असते, बोलण्याची. एकदा माफ करा आणि त्याला सोडून द्या. वास्तविक त्याने असे म्हणायला नको होते. कारण, त्याच्या म्हणण्यानुसार खरच असा प्रसंग भविष्यात उद्भवला, तर उचलून आणण्याऐवजी हात पाय तोडून पुढचे काम करता आले असते, पण एवढी त्याला अक्कल कुठे? हे लक्षात न आल्यामुळे तो काहितरी बरळला असावा.' 

सराफाची मुक्ताफळे ऐकून शेठजींनी सराफालासुद्धा मुलाबरोबर खोलीत डांबून ठेवला. रात्र होत आली, तरी मुलाचा आणि नातवाचा पत्ता नाही, म्हणून सराफाचे वडील दोघांचा शोध घेत शेठजींकडे पोहोचले आणि त्या दोघांना सोडून द्या अशी विनवणी केली. त्या दोघांच्या चुका पदरात घेत आजोबा म्हणाले, `शेठजी, ते दोघेही अज्ञानी आहेत. त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. मी तर म्हणतो, अशी वेळ आली, तर दुसरा तिसरा विचार न करता हवेलीलाच अग्नि देवून टाका, म्हणजे काम झाले.'

आजोबांचे बोलणे ऐकून शेठजी चक्रावले. मुलावर अशा विचारांचा पगडा असल्यावर त्याच्याकडून तरी चांगले वागण्याची-बोलण्याची अपेक्षा तरी कशी करणार? शेठजीनेच माफी मागून त्या तिघांना सोडून दिले. कारण, मूर्खांशी वाद घालणे, म्हणजे मूर्खांची संख्या एकाने वाढवणे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी