शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

शेठजींच्या जीवावर उठलेले आजोबा, मुलगा आणि नातू यांची अजब गजब कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 08:00 IST

मुलांनी आपले वागणे सुधारावे असे वाटत असेल तर मोठ्यांनी आपल्या वागण्याकडे लक्ष दिले पाहिजे. वाचा ही गोष्ट!

अलीकडच्या पिढीची मुले कधी, कुठे, काय बोलतील, सांगता येत नाही. मात्र, ती हे सगळे पोटात शिकून येत नाहीत, तर आपलेच शब्द, विचार, कृती ते टिपकागदासारखे टिपत असतात आणि त्याचीच परतफेड आपल्या कृतीतून, उक्तीतून करत असतात. म्हणून बालवयातच त्यांच्या जीभेला चांगले वळण देणे ही आपली जबाबदारी असते. आज आपण जे बोलू, तेच चार दिवसांनी मुलांकडून ऐकण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. यासाठीच, बालसंस्कार अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांना बालपणीच जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायला शिकवले पाहिजे. मान दिला, तर मान मिळता़े  अपमान केला, तर अपमान मिळतो. हीच जगाची रित आहे.

एका सराफाला नवसाने एक मुलगा झाला. तो वाईट संगतीला लागून उनाड बनल्यामुळे आईबापाचे बिलकुल ऐकत नसे. आपला परका न पाहता तोंडाला येईल ते बोलावे, सदा खावे, प्यावे आणि वेळ अवेळ न पाहता गावभर हिंडावे, असे तो करीत असे.  

एका दिवाळीच्या दिवशी नगरशेठ दिवाणखान्यातील खुर्चीवर पाय हलवत आराम करत बसले असता, समोरील रस्त्यावरून जात असलेल्या सराफाच्या मुलाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्या शेठचे अगडबंब पोट शरीर पाहून उपहासाने तो सारखा हसू लागला. शेठला वाटले, की आपली श्रीमंती पाहून मुलाला आनंद वाटला असावा. दिपावलीनिमित्त त्याला काहीतरी बक्षिस द्यावे. अशा विचाराने शेठजींनी मुलाला बोलावून घेतले आणि हसण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, `शेठजी खरे सांगू का तुम्हाला? आपले शरीर फारच स्थूल आहे. तुम्हाला जर याक्षणी जागच्या जागी मरण आले, तर खाली नेतेवेळी लोकांनी किती फजिती होईल. या विचाराने हसू आले.

हे ऐकून शेठजी संतापले. त्याला घरात डांबून ठेवले. सायंकाळ झाली, तरी मुलगा घरी न आल्याने सराफाला काळजी वाटू लागली. सराफ चौकशी करत करत शेठजींच्या घरी पोहोचला. शेठजींना मुलाचा जाब विचारला. शेठजींनी खरे कारण सांगून मुलाला डांबून ठेवल्याची कबुली दिली. सराफातला बाप जागा झाला. तो मुलाची वकिली करू लागला. `शेठजी, मुलांचे बोलणे कुठे मनावर घेता, त्यांना कुठे अक्कल असते, बोलण्याची. एकदा माफ करा आणि त्याला सोडून द्या. वास्तविक त्याने असे म्हणायला नको होते. कारण, त्याच्या म्हणण्यानुसार खरच असा प्रसंग भविष्यात उद्भवला, तर उचलून आणण्याऐवजी हात पाय तोडून पुढचे काम करता आले असते, पण एवढी त्याला अक्कल कुठे? हे लक्षात न आल्यामुळे तो काहितरी बरळला असावा.' 

सराफाची मुक्ताफळे ऐकून शेठजींनी सराफालासुद्धा मुलाबरोबर खोलीत डांबून ठेवला. रात्र होत आली, तरी मुलाचा आणि नातवाचा पत्ता नाही, म्हणून सराफाचे वडील दोघांचा शोध घेत शेठजींकडे पोहोचले आणि त्या दोघांना सोडून द्या अशी विनवणी केली. त्या दोघांच्या चुका पदरात घेत आजोबा म्हणाले, `शेठजी, ते दोघेही अज्ञानी आहेत. त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. मी तर म्हणतो, अशी वेळ आली, तर दुसरा तिसरा विचार न करता हवेलीलाच अग्नि देवून टाका, म्हणजे काम झाले.'

आजोबांचे बोलणे ऐकून शेठजी चक्रावले. मुलावर अशा विचारांचा पगडा असल्यावर त्याच्याकडून तरी चांगले वागण्याची-बोलण्याची अपेक्षा तरी कशी करणार? शेठजीनेच माफी मागून त्या तिघांना सोडून दिले. कारण, मूर्खांशी वाद घालणे, म्हणजे मूर्खांची संख्या एकाने वाढवणे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी