शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आयुष्याचा शेवट आनंदात जावा म्हणून श्रीमदशंकराचार्य हा कानमंत्र देतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:35 IST

आनंदी, समाधानी राहण्यासाठी हा कानमंत्र सर्वांना नक्की उपयोगी पडेल.

वृद्धपण हे दुसरे बालपणच असते. मात्र, बालपणी जे हट्ट पुरवले जातात, काळजी घेतली जाते, जेवढे प्रेम मिळते, ते वृद्धापकाळात मिळेलच असे नाही. नात्यांची समीकरणे बदलतात आणि मनुष्याला एकाकी वाटू लागते. जोडीदाराची साथ असेल तर ठीक, अन्यथा तोही निघून गेला असेल, तर वृद्धापकाळ आणखी त्रासदायक वाटू लागतो. तो एकाकीपणा घालवण्यासाठी, आपले पूर्वज कथा, कीर्तनात, भजनात, सत्संगात मन रमवत असत. कारण, आयुष्याचे उत्तरायण सुरू झाले आणि पैलतीर दिसू लागला, की भगवंताचाच आधार आपल्याला वाटू लागतो.  

या परिस्थितीचे वर्णन श्रीमद् आद्य शंकराचार्य करतात,

याविद्वत्तोपार्जनसक्त: तावन्निजपरिवारो रक्त:पश्याद्धावति जर्जर देहे वार्तां, पृच्छति कोपि न गेहे।।

माणूस धडधाकट असतो. पैसा मिळवतो, तोपर्यंत कुटुंबातील माणसे आणि आप्तेष्ट त्याची आस्थेने विचारपूस करतात. पण म्हातारपण आले, की त्याची घरात पूर्ण उपेक्षा होते. असे झाले नाही तर उत्तम, पण म्हातारपणी एकाकी राहण्याची मानसिक सिद्धता मात्र माणसाने अवश्य करावयास पाहिजे. ही सिद्धता करण्याचा मार्ग आचार्यांनी सांगितला आहे. 

भज गोविंदं भज गोविंदं, भज गोविंदं मूढमते।

परमेश्वराकडे लक्ष लावा, म्हणजे आपण एकटे आहोत, आपली उपेक्षा होते किंवा इतरांकडून आपल्याला आनंद मिळणार आहे, हा सारा भ्रम दूर होतो. माणसाला स्वत:च्या आनंदमय स्वरूपाची ओळख होते आणि परावलंबन मावळते. काही प्रमाणात शरीराचे भोग सोसण्याची शक्तीही लाभते. 

वृद्धापकाळी प्राप्त परिस्थितीचा समाधानाने स्वीकार करून आनंदात राहता येणे, ही फार मोठी कमाई असते. आपण एकटे आहोत, उपेक्षित आहोत, अडगळीसारके आहोत, असे वाटून न घेता ईश्वरचिंतनात उर्वरित आयुष्य घालवले पाहिजे. 

याचा अर्थ असा नाही, की वृद्धापकाळातच भगवंताचे नाम:स्मरण करावे. तर, एकाकीपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर येऊ शकते. अशा वेळी कोणाची साथ मिळते, तर कोणाची नाही.  यावर तुकाराम महाराज तोडगा शोधतात. त्यांनी जो सोबती निवडला आहे, तो कधीच एकाकी पडू देणार नाही. आपणही त्याचेच बोट धरावे, असा ते आग्रह करत आहेत...

जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती,चालविसी हाती धरूनिया।।

तुकाराम महाराजांनीदेखील प्रपंच सांभाळून परमार्थ केला. त्यांच्याही वाट्याला सुख-दु:खं आली. परंतु, ते सांगतात, अशा कोणत्याही प्रसंगी मला एकटेपणा कधीच वाटला नाही, कारण साक्षात भगवंतालाच मी माझा सोबती करून घेतला. तुम्हीसुद्धा त्याच्याशी सख्य जोडले, तर तुम्हालाही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपला सोबती आहे, हा दिलासा मिळत राहिल. मग शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही केवळ परमानंद अनुभवत राहाल. 

निश्चितीने आता पावलो विश्रांती,खुंटलिया धावा तृष्णेचिया।।

जोवर शरीरात ताकद होती, तोवर तन, मन, देहाने सर्व जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. हे आत्मिक समाधान असले, की वृद्धापकाळात मनात कुठलेही शल्य राहत नाही. निवृत्ती केवळ कामातूनच नाही, तर सर्व व्याप, तापातून मिळालेली असते. अशावेळी अपेक्षांचे ओझे उतरवून ठेवले आणि विठ्ठलचरणी मन लावले, की सर्वार्थाने विश्रांती मिळाल्याचे समाधान लाभते. 

तुका म्हणे विठो भरला सबाह्य,काय उणे आम्हा चराचरी।।

असे समाधानी लोक कधीच दु:खी दिसत नाहीत. कारण, त्यांना आनंदाचा ठेवा प्राप्त झालेला असतो. ही सवय मनाला लावून घेतली, की सांसारिक विषयातून मन अलिप्त होत जाते आणि सबाह्य अंतरी केवळ विठ्ठलाचा सहवास घडू लागतो. मन धीट होते व म्हणते,

आता होणार ते होयेना का, जाणार ते जायेना का,तुटली मनातील आशंका, जन्ममृत्यूची।।

मी तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदासाठी कोणावर अवलंबून नाही, हेच मनाला समजवत राहा, हा कानमंत्र श्रीमद् आद्य शंकराचार्य देत आहेत.