शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Shravan Purnima 2023: श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाची पूजा केली जाते, त्यामागे आहे रामकथा; कोणती ते जाणून घ्या! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:46 IST

Shravan Purnima 2023: श्रावण मास जसा व्रत वैकल्यांचा तसाच तो श्रावण बाळाचे स्मरण करून त्याच्या पूजेचा, त्यासाठी हा श्रावण पौर्णिमेचा दिवस; वाचा सविस्तर कथा!

श्रावण कुमार हे नाव घेताच डोळ्यासमोर उभी राहते ती श्रावण बाळाची प्रतिमा. तोच श्रावण बाळ जो आपल्या अंध माता पित्याला कावडीतून नेत तीर्थयात्रा घडवत होता. श्रावण पौर्णिमेच्या तिथीला त्याच्या आयुष्यात एक विचित्र क्षण आला मात्र त्याच्या बलिदानामुळे या सृष्टीला विष्णूंचा श्रीराम अवतार पाहण्याचे भाग्य लाभले. जाणून घेऊया तीकथा . 

श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाला राजा दशरथाने हरीण समजून मारले, त्या अचानक उद्भवलेल्या आपत्तीने आणि पुत्राच्या वियोगाने श्रावणबाळाच्या आईवडिलांना शोक अनावर झाला. दशरथाने त्यांचे सांत्वन केले आणि आपल्या हातून नकळत घडलेल्या अपराधाची क्षमा मागितली. श्रावण गेला हे ऐकून त्या माउलीने प्राण सोडले तर श्रावणाच्या पित्याने राजा दशरथाला शाप दिला, 'तू सुद्धा आमच्यासारखाच पुत्र वियोगाने मरशील!' राजाच्या हातून अपराध घडला होता म्हणून त्या घटनेचं परिमार्जन म्हणून त्याने आपल्या राज्यात सर्वांना श्रावण पूजेचा आग्रह धरला. तेव्हापासून श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाचे स्मरण करून पूजा केली जाते.

ही होती श्रावण पौर्णिमेची अप्रिय आठवण आणि चांगली आठवण सांगायची तर हाच शाप राजा दशरथासाठी वरदान ठरले. राजाला चार राण्या असूनही संतानप्राप्ती झाली नव्हती. कोसल देशातील अयोध्या नगरीला उत्तराधिकारी नव्हता. आपल्या हातून नकळत घडलेल्या पापाची राजाने गुरु वसिष्ठांसमोर जेव्हा कबुली दिली, तेव्हा गुरुंनी राजाला दिलासा देत म्हटले, 'राजा तुझ्या हातून पातक घडले आहे यात शंका नाही, परंतु हा शाप तुझ्यासाठी वरदान ठरणार आहे. त्यांनी तुला पुत्रवियोगाचा शाप दिला आहे, त्याअर्थी तू निपुत्रिक राहणार नाहीस तर तुला संतानप्राप्ती होणार आहे. भेटी गाठी झाल्यावर वियोगाचे दुःख कधी न कधी येणारच. त्यामुळे श्रावण बाळाचे व त्याच्या माता पित्यांचे विधिवत अंत्य संस्कार करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वहा आणि पुत्र प्राप्तीचे वरदान फलद्रूप होण्यासाठी पुत्रकामेष्टी कर.

राजाने गुरुंचे वचन प्रमाण मानून यज्ञ केला. त्या यज्ञातून अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रसादरूपी पायसपात्र राजाला सोपवून त्याच्या तिन्ही राण्यांना देण्यास सांगितले. तो प्रसाद कौसल्या, सुमित्रा, कैकयी ने ग्रहण केला. यथावकाश त्यांना मुले झाली. त्या मुलांनी धर्म कार्यार्थ आपले आयुष्य वेचले आणि बंधू प्रेमाचा आदर्श जगाला घालून दिला. ती मुले होती - श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न!

या दोन्ही कथा पाहता श्रावणी पौर्णिमेचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कायम स्मरणात राहील. 

 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलramayanरामायणRaksha Bandhanरक्षाबंधन