शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

Sankashti Chaturthi 2024: फाल्गुन मासातील भालचंद्र संकष्टी आहे खास; बाप्पाची करा उपासना पूर्ण होईल आस!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 11:45 AM

Sankashti Chaturthi 2024: २८ मार्च रोजी फाल्गुन मासातील संकष्ट चतुर्थी आहे, या चतुर्थीचे खास महत्त्व जाणून घ्या आणि दिलेले उपाय अवश्य करा. 

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. फाल्गुन मास अर्थात मराठी वर्षातला शेवटचा महिना आणि त्यात आलेली ही चतुर्थी भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तसेच या व्रताचे पालन केल्याने श्रीगणेशाच्या कृपेने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात यश प्राप्त होते.

भालचंद्र संकष्ट चतुर्थी हे नाव का?

भालचंद्र हे नाव गणेशाला मिळाले कारण त्याने आपल्या पित्याप्रमाणे डोक्यावर चंद्र धारण केला. त्याची शीतलता बाप्पाच्या चेहऱ्यावर कायम दिसते. बाप्पाने चंद्राला धारण करणे हा चंद्राचा गौरव! आणि तीच ओळख या व्रताला मिळाली. 

भालचंद्र चतुर्थी चंद्रोदय 

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल. कॅलेंडरनुसार, यावर्षी ही तारीख २८ मार्च रोजी संध्याकाळी ६.५६ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ मार्च रोजी रात्री ८.२० मिनिटांनी संपेल. चंद्रोदयाच्या आधारावर २८ मार्च २०२४ रोजी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाईल आणि चंद्रोदय झाल्यावर उपास सोडला जाईल. तर चंद्रोदयाची वेळ रात्री ९.२८ मिनिटांची आहे.

संकष्टीनिमित्त शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त 

पंचांगानुसार २८ मार्च २०२४ रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी १०.५४ ते दुपारी १२.२६ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५.०४ ते ६.३७ पर्यंत आहे.

भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

हिंदू धर्मात, भगवान गणेश ही पहिली पूजनीय देवता मानली जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा अनिवार्य आहे. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम केल्यास यश मिळते, असे म्हटले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत देखील गणपतीला समर्पित केले जाते आणि या दिवशी त्याची विधीपूर्वक पूजा केली जाते. भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते. यासोबतच कोणत्याही कामात येणारे अडथळे दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो.

अशी करा उपासना : 

संकष्टीची उपासना : या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. देवाची करुणा भाकावी, त्याच्या सान्निध्यात राहावे, पूजा करावी, अभिषेक करावा. यामुळे पूजेत मन एकाग्र होते. बाह्य विश्वाचा विसर पडतो. मुखी नाम यावे, याकरीता 'ओम गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करावा. अथर्वशीर्ष पाठ असल्यास त्याची ११ किंवा २१ आवर्तने करावी. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तीभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही!

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३