शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Mahabharat Story: महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 13:06 IST

Mahabharat Story: श्रीकृष्ण द्वारकेत परतल्यावर रुक्मिणीने भीष्म पीतामह आणि दानशूर कर्णाच्या वधाबाबत प्रश्न विचारले.

सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी महाभारत युद्ध झाल्याचे सांगितले जाते. महाभारत युद्धात अनेकविध गोष्टी घडल्याचे म्हटले जाते. धर्म आणि अधर्म या तत्त्वांवर हे युद्ध सुरू झाले. हजारो योद्धे यात सहभागी झाले. हजारोंना वीरमरण आले. १८ दिवस तुंबळ युद्ध झाल्यानंतर अखेर पांडवांचा जिंकले. श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता पांडावांना विजयश्री प्राप्त करून दिली. याच महाभारत युद्ध भूमीवर कालातीत असलेले गीताज्ञान ब्रह्मांडाला मिळाले. मात्र, महाभारत संपल्यावर श्रीकृष्ण द्वारकेत परतल्यावर रुक्मिणीने भीष्म पीतामह आणि दानशूर कर्णाच्या वधाबाबत प्रश्न विचारले. यावर श्रीकृष्णांनी नेमके उत्तर दिले. श्रीकृष्ण नेमके काय म्हणाले? वाचा...

सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक

रुक्मिणीने श्रीकृष्णांना विचारले की, द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह यांसारख्या नेहमी धर्माचे, सत्याच्या बाजूने उभ्या राहण्याऱ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वांच्या वधाचे समर्थन आपण कसे काय केले? यावर, श्रीकृष्ण उत्तरले की, हे खरे आहे. या दोघांनी आयुष्यभर धर्म पाळला. सत्याची कास सोडली नाही. मात्र, त्यांनी केलेल्या एका पापामुळे दोघांनी आपले सर्व पुण्य गमावले. काहीसे आश्चर्यचकीत होऊन रुक्मिणीने श्रीकृष्णांना विचारले की, ती पापे कोणती? याबाबत मला सांगावे.

सुखी आणि समृद्ध जीवनासाठी रोज सकाळी न चुकता सूर्याला अर्घ्य द्या!

श्रीकृष्णांनी सांगितले की, द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, त्यावेळी हे दोघे त्या राजसभेत उपस्थित होते आणि वडील होण्याच्या नात्याने ते दुःशासनाला आज्ञा देऊ शकले असते. पण, त्यांनी तसे नाही केले. या पापामुळे त्यांचा धर्म लहान झाला. श्रीकृष्णाच्या उत्तराने रुक्मिणीचे काहीसे समाधान झाले. मग रुक्मिणीने कर्णाबाबत प्रश्न केला. कर्णाचे काय? तो तर आपल्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता. त्याने कधीच कोणालाही आपल्या दारातून रिकाम्या हाती पाठवले नाही. मग त्याच्या बाबतीत असे का झाले?

मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान

कर्ण आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता. त्यांने कधीच कोणाला नाही म्हटले नाही, हेही तितकेच खरे. परंतु, जेव्हा सर्व योद्धांशी लढून अभिमन्यू घायाळ होऊन रणांगणात पडलेला असताना त्याने जवळ उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. कर्ण जिथे उभा होता, तिथे जवळच पाण्याचा खड्डा होता. जगाला मदत करणाऱ्या कर्णाने प्राणाशी झुंजणाऱ्या अभिमन्यूला पाणी दिले नाही. म्हणूनच त्याने केलेले सर्व पुण्य नष्ट झाले. नंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याच्या रथाचे चाक अडकले, असे श्रीकृष्णांनी सांगितले. 

समर्थ रामदास रचित म्हणायला अवघड परंतु आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ!

आपल्या आजूबाजूला काहीतर चुकीचे घडत असल्याची जाणीव असून तसेच आपण त्या स्थितीत असूनही काही करू शकत नाही. असे केल्याने आपण त्या पापाचे समान भागीदार ठरतो. कुठल्याही जीवाने केलेले कर्म ते चांगले असो किंवा वाईट असो, शतकांपर्यंत आपला पाठलाग सोडत नसतात. विचार आपल्या हट्टी मनावर नियंत्रण करण्यासाठी मनाची अत्यंत सूक्ष्म क्रिया असते, असे श्रीकृष्ण रुक्मिणीला सांगतात. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत