शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ritual: स्मशानातून परतल्यावर 'आंघोळ' का करावी लागते? केवळ स्वच्छता की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:05 IST

Rituals: मृतदेहाच्या संपर्कात आल्यावर तुमचं ऊर्जावलय बदलतं असे म्हणतात, यासाठी शास्त्रातील 'हा' मोठा उलगडा जाणून घ्या.

स्मशानातून आल्यावर 'आंघोळ' का करतात? स्नान आणि आंघोळ शब्दातला मोठा फरक जाणून घ्याआंघोळ, स्नान आणि अभ्यंग स्नान...लहानपणापासून आपण हे तीन शब्द ऐकतो, पण या तिन्ही प्रक्रियांचे हेतू पूर्णपणे वेगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची जोड देऊन या गोष्टी कशा ठरवल्या आहेत, ते पाहूया.

माघी पौर्णिमा २०२६: ६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  

१. आंघोळ: शरीराची आणि 'सूतकाची' शुद्धी

'आंघोळ' हा शब्द सामान्यतः दैनंदिन स्वच्छतेसाठी वापरला जातो, पण त्याचे विशेष महत्त्व 'अशौच' किंवा 'विटाळ' दूर करण्यासाठी असते.

स्मशानातून आल्यावर: जेव्हा आपण अंत्यविधी आटोपून स्मशानातून घरी येतो, तेव्हा मृत शरीरातील सूक्ष्म जंतू आणि तिथली नकारात्मक ऊर्जा (नकारात्मक स्पंदने) आपल्या संपर्कात आलेली असते.

ही नकारात्मकता आणि अशुद्धी दूर करण्यासाठी 'सैल वस्त्राने' केलेली शुद्धी म्हणजे आंघोळ. यावेळी कपाळाला टिळा लावणे किंवा देवपूजा वर्ज्य असते, जोपर्यंत पूर्ण शुद्धी होत नाही. म्हणून त्या आंघोळीला विशेष महत्त्व असते. 

२. स्नान: मनाची आणि आत्म्याची प्रसन्नता

'स्नान' हा शब्द अधिक व्यापक आणि पवित्र मानला जातो. रोज सकाळी आपण जे करतो, त्याला 'प्रात:स्नान' म्हणतात.

हेतू: केवळ शरीराचा घाम किंवा धूळ काढणे हा याचा उद्देश नसून, झोपेतून उठल्यावर शरीरात आलेला आळस (तमोगुण) झटकून 'सत्त्वगुण' वाढवणे हा असतो.

फायदा: स्नानामुळे रक्ताभिसरण सुधारते, मनाला उभारी मिळते आणि शरीर देवपूजेसाठी किंवा कार्यासाठी पात्र ठरते. मंत्रोच्चारात किंवा पवित्र नद्यांमध्ये केले जाते ते 'पुण्यस्नान' असते.

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत

३. अभ्यंग स्नान: आरोग्याची आणि समृद्धीची खात्री

दिवाळीच्या पहाटे किंवा शुभ कार्यावेळी आपण जे 'अभ्यंग स्नान' करतो, ते खऱ्या अर्थाने 'उपचार' पद्धती आहे.

विधी: यात अंगाला सुगंधी तेल आणि उटणे (आयुर्वेदिक औषधी चूर्ण) लावून मालिश केली जाते. त्यानंतर कोमट पाण्याने स्नान केले जाते.

महत्त्व: उटण्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि कांती तजेलदार होते. आध्यात्मिकदृष्ट्या, हे स्नान ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याची शरीराची क्षमता वाढवते. दिवाळीतील अभ्यंग स्नान हे नरकासुराचा वध (नकारात्मकतेचा नाश) आणि विजयाचे प्रतीक मानले जाते.

त्यामुळे यापुढे हे तिन्ही शब्द जबाबदारीने आणि योग्य तिथेच वापरा. 

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींशी लग्न होणे हे 'लॉटरी' लागण्यासारखेच!

English
हिंदी सारांश
Web Title : Ritual Bath After Cremation: Purity, Significance, and Types Explained

Web Summary : Exploring the significance of bathing after cremation, the article differentiates between 'Anghol,' 'Snan,' and 'Abhyang Snan.' It highlights that bathing after visiting the crematorium is essential for removing negative energy, while other types of baths serve different spiritual and health purposes.
टॅग्स :Traditional Ritualsपारंपारिक विधी