Ritual: स्मशानातून परतल्यावर 'आंघोळ' का करावी लागते? केवळ स्वच्छता की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:05 IST2026-01-30T15:03:49+5:302026-01-30T15:05:46+5:30

Rituals: मृतदेहाच्या संपर्कात आल्यावर तुमचं ऊर्जावलय बदलतं असे म्हणतात, यासाठी शास्त्रातील 'हा' मोठा उलगडा जाणून घ्या.

Ritual: Why do you have to take a bath after returning from the cemetery? Just for cleanliness or something more? | Ritual: स्मशानातून परतल्यावर 'आंघोळ' का करावी लागते? केवळ स्वच्छता की आणखी काही?

Ritual: स्मशानातून परतल्यावर 'आंघोळ' का करावी लागते? केवळ स्वच्छता की आणखी काही?

स्मशानातून आल्यावर 'आंघोळ' का करतात? स्नान आणि आंघोळ शब्दातला मोठा फरक जाणून घ्याआंघोळ, स्नान आणि अभ्यंग स्नान...लहानपणापासून आपण हे तीन शब्द ऐकतो, पण या तिन्ही प्रक्रियांचे हेतू पूर्णपणे वेगळे आहेत. आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची जोड देऊन या गोष्टी कशा ठरवल्या आहेत, ते पाहूया.

माघी पौर्णिमा २०२६: ६२ वर्षांनंतर माघी पौर्णिमेला महायोग! 'हे' ३ उपाय पालटतील तुमचे नशीब; चुकवू नका ही सुवर्णसंधी  

१. आंघोळ: शरीराची आणि 'सूतकाची' शुद्धी

'आंघोळ' हा शब्द सामान्यतः दैनंदिन स्वच्छतेसाठी वापरला जातो, पण त्याचे विशेष महत्त्व 'अशौच' किंवा 'विटाळ' दूर करण्यासाठी असते.

स्मशानातून आल्यावर: जेव्हा आपण अंत्यविधी आटोपून स्मशानातून घरी येतो, तेव्हा मृत शरीरातील सूक्ष्म जंतू आणि तिथली नकारात्मक ऊर्जा (नकारात्मक स्पंदने) आपल्या संपर्कात आलेली असते.

ही नकारात्मकता आणि अशुद्धी दूर करण्यासाठी 'सैल वस्त्राने' केलेली शुद्धी म्हणजे आंघोळ. यावेळी कपाळाला टिळा लावणे किंवा देवपूजा वर्ज्य असते, जोपर्यंत पूर्ण शुद्धी होत नाही. म्हणून त्या आंघोळीला विशेष महत्त्व असते. 

२. स्नान: मनाची आणि आत्म्याची प्रसन्नता

'स्नान' हा शब्द अधिक व्यापक आणि पवित्र मानला जातो. रोज सकाळी आपण जे करतो, त्याला 'प्रात:स्नान' म्हणतात.

हेतू: केवळ शरीराचा घाम किंवा धूळ काढणे हा याचा उद्देश नसून, झोपेतून उठल्यावर शरीरात आलेला आळस (तमोगुण) झटकून 'सत्त्वगुण' वाढवणे हा असतो.

फायदा: स्नानामुळे रक्ताभिसरण सुधारते, मनाला उभारी मिळते आणि शरीर देवपूजेसाठी किंवा कार्यासाठी पात्र ठरते. मंत्रोच्चारात किंवा पवित्र नद्यांमध्ये केले जाते ते 'पुण्यस्नान' असते.

Hanuman Chalisa: अडलेली कामे होतील पूर्ण! करून बघा ११ दिवसांचे हे प्रभावी हनुमान व्रत

३. अभ्यंग स्नान: आरोग्याची आणि समृद्धीची खात्री

दिवाळीच्या पहाटे किंवा शुभ कार्यावेळी आपण जे 'अभ्यंग स्नान' करतो, ते खऱ्या अर्थाने 'उपचार' पद्धती आहे.

विधी: यात अंगाला सुगंधी तेल आणि उटणे (आयुर्वेदिक औषधी चूर्ण) लावून मालिश केली जाते. त्यानंतर कोमट पाण्याने स्नान केले जाते.

महत्त्व: उटण्यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि कांती तजेलदार होते. आध्यात्मिकदृष्ट्या, हे स्नान ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याची शरीराची क्षमता वाढवते. दिवाळीतील अभ्यंग स्नान हे नरकासुराचा वध (नकारात्मकतेचा नाश) आणि विजयाचे प्रतीक मानले जाते.

त्यामुळे यापुढे हे तिन्ही शब्द जबाबदारीने आणि योग्य तिथेच वापरा. 

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींशी लग्न होणे हे 'लॉटरी' लागण्यासारखेच!

Web Title : श्मशान से लौटने पर स्नान: शुद्धता, महत्व और प्रकारों की व्याख्या

Web Summary : श्मशान से लौटने के बाद स्नान के महत्व की खोज करते हुए, लेख 'आंघोळ,' 'स्नान' और 'अभ्यंग स्नान' के बीच अंतर करता है। यह बताता है कि श्मशान से लौटने के बाद नकारात्मक ऊर्जा को दूर करने के लिए स्नान आवश्यक है, जबकि अन्य प्रकार के स्नान विभिन्न आध्यात्मिक और स्वास्थ्य उद्देश्यों की पूर्ति करते हैं।

Web Title : Ritual Bath After Cremation: Purity, Significance, and Types Explained

Web Summary : Exploring the significance of bathing after cremation, the article differentiates between 'Anghol,' 'Snan,' and 'Abhyang Snan.' It highlights that bathing after visiting the crematorium is essential for removing negative energy, while other types of baths serve different spiritual and health purposes.