शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर...सद्गुरूंचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:35 IST

Mahakumbh 2025: हातून कळत नकळत घडलेली पापं नष्ट व्हावीत म्हणून लाखो भाविक कुंभस्नान करतात; मात्र सद्गुरूंचे मत थोडे वेगळे आहे, काय ते जाणून घ्या!

'अन्य क्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति' असे वचन आहे. अर्थात अन्य ठिकाणी केलेली पापे पुण्यक्षेत्री गेल्यामुळे नष्ट होतात. या वचनानुसार प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याचा (Mahakumbh 2025) विचार केला, तर तिथे जमलेल्या लाखो लोकांचे पाप धुतले जाणे शक्य आहे का? यावर सद्गुरू काय म्हणाले ते पाहू. 

सनातन धर्मात तीर्थक्षेत्री केलेले स्नान तीर्थस्नान म्हणून ओळखले जाते. अनेक भाविक श्रद्धेने आजही तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करतात. कुंभमेळ्यात तर त्याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण ग्रहांच्या विशिष्ट योगात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यातही प्रयाग राज येथे भरलेला महाकुंभ १४४ वर्षांनी आला आहे, तिथे त्रिवेणी संगम आहे, अनेक नागा साधू तिथे शाही स्नानासाठी येतात, त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक तिथे कुंभ स्नान करण्यासाठी धडपडतात. 

कुंभस्नानाने पाप धुतले जाते का?

मात्र सद्गुरू सांगतात, 'कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर त्यासाठी तुमचे पूर्व कर्म, वर्तमान आणि भविष्यातील कर्म शुद्ध असावे लागते. अन्यथा पापांचे परिमार्जन होणार नाही. याउलट तुम्ही जर सत्कर्म करत राहिलात, तर तुमच्या शरीरावर पडणारे पाणीच नाही तर शरीरात असलेले ७२ टक्के पाणी संगमावरील पाण्यासारखे तीर्थ होईल आणि तुम्हाला पुण्य मिळेल आणि मृत्यूपश्चात मोक्ष मिळेल. त्यामुळे कर्मावर भर द्या, ते योग्य आहे की अयोग्य ते वेळोवेळी तपासून बघा आणि ते सुधारून पावन व्हा!'

कुंभस्नान करावे की नाही?

सद्गुरू सांगतात, तीर्थक्षेत्री जावे, स्नान करावे, अगदी कुंभस्नानदेखील करावे. मात्र त्यामुळे सगळी पापे धुतली गेली आणि आपण नवीन पापे करण्यास तयार झालो असा गैरसमज करून घेऊ नका. तीर्थक्षेत्री गेल्याने मनुष्यात अंतर्बाहय बदल होतात. ती दिव्य अनुभूती घेण्यासाठी कुंभमेळ्यात जा, कुंभस्नान करा मात्र त्याबरोबरीने आपले कर्म स्वच्छ ठेवा आणि सत्कार्य करत राहा, म्हणजे मोक्ष मिळेल. 

महाकुंभात सहभागी होता आले नाही तर?

ज्यांना महाकुंभात सहभागी होता आले नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. प्रत्यक्ष तिथे जाता आले नाही, तरीदेखील १४४ वर्षातून एकदा येणाऱ्या महाकुंभाचे आपण दुरून का होईना साक्षीदार आहोत. त्यामुळे अंघोळ करताना पंचनद्यांचे स्मरण करावे, देवाचे स्मरण करावे, आपले कर्म शुद्ध अंत:करणाने आचरावे. ही कृती केवळ पर्वकाळात नाही तर आयुष्यभर करता येणार आहे. विशेषतः शाही स्नानाच्या तारखा दिल्या आहेत, त्यादिवशी आवर्जून हा उपाय करा, पुण्य लाभेल. 

शाही स्नानाची तिथी :

१३ जानेवारी : पौष पौर्णिमा १४ जानेवारी : मकर संक्रांति २९ जानेवारी : पौष अमावस्या ०३ फेब्रुवारी : वसंत पंचमी १३ फेब्रुवारी : माघ पौर्णिमा २६ फेब्रुवारी : महाशिवरात्री 

प्रयाग राज येथे गेल्यास या दोन मंदिरांना भेट द्या : 

महाकुंभात शाही स्नान आणि दान केल्यानंतर बडे हनुमान आणि नाग वसुकीच्या दर्शनाला नक्की जा. शाही स्नानानंतर या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंदिरात गेल्यास महाकुंभाचा धार्मिक प्रवास पूर्ण मानला जातो!

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा