शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जया एकादशी: शुभ योगात ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, पारण मुहूर्त, सोपा पूजा विधी अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:52 IST

Jaya Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: जया एकादशीचे व्रत करणे आणि शुभ मुहूर्तावर पारण करणे लाभदायी आणि सुख-समृद्धीकारक मानले जाते. जाणून घ्या...

Jaya Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेक पुण्य फलदायी व्रते, सण साजरे केले जातात. अनेकार्थाने माघ महिना अनन्य साधारण मानला जातो. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत आचरले जाते. या एकादशी व्रतांची नावे वेगवेगळी असतात. या नावांवरून त्या एकादशीचे महात्म्य आणि महत्त्व अधोरेखित होते. माघ शुद्ध एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी जया एकादशी आहे. जया एकादशीला येणारे शुभ योग, शुभ पारण मुहूर्त, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घेऊया...

या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते. प्रत्येक एकादशीचे वेगवेगळे महत्त्व आहे. जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते व मन शांत राहते. या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते, अशी श्रद्धा आहे. प्रत्येक एकादशीला श्रीविष्णूंची पूजा केली जाते. श्रीविष्णूंशी संबंधित स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप केले जातात. नामस्मरण केले जाते. एकादशीला विष्णू सहस्रनामाचे पठण करणे पुण्यफलदायी मानले जाते. 

जया एकादशी व्रत पूजन आणि पारणाचा शुभ मुहूर्त 

माघ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी तिथी शुक्रवार, ०७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ०९ वाजून २७ मिनिटांनी सुरू होत आहे. माघ शुद्ध एकादशी शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ०८ वाजून १४ मिनिटांनी संपत आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे माघ शुद्ध जया एकादशीचे व्रत शनिवार, ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी आचरावे, असे सांगितले जात आहे. या दिवशी शुभ मानला गेलेला रवि योग जुळून आला आहे. जया एकादशीचा पारण मुहूर्त रविवार, ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०६ वाजून ५१ मिनिटांपासून ०९ वाजून ०६ मिनिटांपर्यंत असेल.

जया एकादशी व्रत तीन प्रकारे केले जाते

एकादशीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हे व्रत अतिशय पुण्यदायी मानले जाते. हे व्रत तीन प्रकारे केले जाते. उपाशी राहून, फलाहार करून किंवा फक्त पाणी पिऊन! परंतु, आजच्या धकाधकीच्या जिवनात असे कठोर व्रत करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. म्हणून शास्त्राने यावर पर्याय सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा. एकादशी ही विष्णूंची प्रिय तिथी आहे. त्यानिमित्त विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे, विष्णूंना भक्तीभावाने तुळस वाहणे, गरजूंना दान करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. 

जया एकादशी व्रतपूजन कसे करावे?

सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

जया एकादशी व्रताचरणाची सांगता कशी करावी?

जया एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये, असे म्हटले जाते. तसेच व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपली की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी. 

टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक