शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

'या' तीन राशींच्या लोकांशी जुळवून घेणे म्हणजे तारेवरची कसरतच असते! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 3:47 PM

यांच्या नाकावरच्या रागाला औषध 'नाय' पण नाकावच्या रागाचं म्हणणं तरी 'काय?'

राग येणे ही तशी सामान्य बाब आहे. परंतु काही लोकांच्या नाकावर एवढा राग असतो की कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होतात. या लोकांना त्यांच्या कामात किंवा जीवनात कोणताही हस्तक्षेप आवडत नाही. जर कोणी त्यांच्या कामात छोटीशी चूक केली किंवा कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा सहज रागवतात. या लोकांशी जुळवून घेणे थोडे कठीण आहे. हा केवळ त्यांच्या स्वभावाचा भाग नाही, तर त्यांच्या राशीचाही परिणाम असतो असे ज्योतिषशास्त्र सांगते. बारा राशींपैकी तीन राशी शीघ्र कोपी म्हणून ओळखल्या जातात. त्या तीन राशी कोणत्या ते जाणून घ्या!

कन्या: कन्या राशीचे लोक कामाच्या बाबतीत टापटीप असतात. त्यांच्याशी संबंधित कामात हलगर्जीपणा केलेला त्यांना अजिबात चालत नाही. प्रत्येक गोष्ट ही त्यांना त्यांच्या मनासारखीच हवी असते.  कामातली उणीव त्यांना चालत नाही. गोष्टी मनासारख्या घडेपर्यंत त्यांच्या नाकावरचा राग कमी होत नाही!

सिंह: सिंह राशीच्या लोकांमध्ये जन्मजात गर्व आणि अभिमानाची भावना असते. त्यांना असे वाटते की लोकांनी नेहमी त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर त्यांना विशेष वागणूक मिळाली नाही तर त्यांना तो अपमान वाटतो. यांना लोकांशी जुळवून घेता येत नाही, पण लोकांनी आपल्याशी जुळवून घ्यावे अशी त्यांची अवास्तव अपेक्षा असते. 

धनु : धनु राशीच्या लोकांना बदल आवडत नाहीत. त्यांना त्यांची शिस्तबद्ध जीवनपद्धती आवडते. त्यात कोणाची लुडबुड चालत नाही. त्यात कोणी बदल केला तर त्यांचा पारा चढतो. या व्यतिरिक्त त्यांना आपलेच म्हणणे खरे करण्याची सवय असते. या स्वभावामुळे ते लोकांना दुखावतात आणि लोक बोलत नाहीत म्हणून हे पुन्हा त्यांच्यावरच रागवतात.  

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य