गुरुवारी हनुमान जन्मोत्सव २०२६: कलियुगात स्वामी-हनुमान सेवा काळाची गरज; नेमके काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:46 IST2026-04-01T10:43:02+5:302026-04-01T10:46:41+5:30
Guruwari Hanuman Janmotsav 2026: गुरुवारी हनुमान जन्मोत्सव असून, स्वामी आणि मारुतीरायाची सेवा कशी करावी? जाणून घ्या...

गुरुवारी हनुमान जन्मोत्सव २०२६: कलियुगात स्वामी-हनुमान सेवा काळाची गरज; नेमके काय करावे?
Guruwari Hanuman Janmotsav 2026: कलियुगात संकटे गळ्यापर्यंत आली की मनुष्य कुठल्यातरी शक्तीचा आधार घेतो आणि त्यास शरण जाऊन नतमस्तक होतो. आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात प्रत्येकाचा संयम संपलेला आहे किंवा संपत चाललेला आहे. संयम हवा आणि संयमाचा उगम हा नामातून होत असतो. गुरुतत्व समजणे महत्वाचे आहेत. गुरूंची नावे वेगवेगळी असली तरी गुरु हे एक तत्व आहे. आपण आपल्या कुवतीप्रमाणे त्यांची सेवा करावी. कुठल्याही अपेक्षेविरहित आत्यंतिक ओढीने प्रेमाने घेतलेले त्यांचे नाव निश्चित त्यांच्या पर्यंत पोहोचणार. गुरु हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे.
सगळ्यात मोठा गुरु म्हणजे आपला अंतरात्मा, आपला आतला आवाज, आपले मन काहीही म्हणा. अनेकदा आपण म्हणतो तुझा आतला आवाज काय सांगतो ते ऐक आणि तेच गुरुचे सूक्ष्म रुप आहे. गुरु आपल्या अवती भवतीच आहे, आपलाच एक भाग आहे. आपण उपासनेसाठी नाही . उपासना आपले आयुष्य समृद्ध करते . जिथे राम तिथे राम आणि राम आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होण्यासाठीच उपासना आहे.
फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार
नाम आपल्याला संयमित करते. मन शांत होते. नाम सकारात्मकता देते. नाम हे जीवनातील जादूच्या कांडी सारखे काम करते . नामाची महती ते घेतल्याशिवाय समजणार नाही. आपण घेत असलेले नाम किंवा मंत्र हा गुरूंच्या आज्ञेशिवाय सिद्ध होत नसतो . मंत्राचे विलक्षण परिणाम अनुभवायला येणे हेही त्यांच्याच हाती असते. आपण मनापासून नाम घ्यायचे मंत्र म्हणायचे फळ कधी द्यायचे ते गुरु ठरवणार. त्यामुळेच गुरुवारी स्वामींच्या मंत्राचा जप अवश्य करावा. ‘श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र किमान १०८ वेळा तर जपावा. तसेच स्वामींचा तारक मंत्र आवर्जून म्हणावा. बाकी काही सेवा जमली नाही, तर सदर सेवा करून स्वामींना मनापासून नमस्कार करावा.
हनुमान जन्मोत्सव २०२६ ला काय कराल?
राहु केतुला आवर घालण्यासाठी आणि शनि कृपा मिळवण्यासाठी हनुमान चालिसा हा उपाय सर्वश्रेष्ठ आहे. रामाचा जप करून हनुमान चालिसा नित्य म्हटली तर आश्चर्यकारक परिणाम आणि अनुभूती मिळते. कुठलाही विचार न करता हनुमान चालिसा, शनिचा जप अखंड करा त्याआधी आपल्या कुलस्वामिनीचा जप आणि सद्गुरू स्वामी समर्थांचा जप करावा. आयुष्य बदलून जाईल. प्रत्येक गोष्टीत मार्ग मिळेल , प्रत्येक पहाट सुखाची असेल . शनि प्रत्येक गोष्ट विलंब करतो पण देणार नाही, असे कधीच म्हणत नाही . संयम शिकवतो. प्रतीक्षेनंतरचा प्रत्येक क्षण मात्र आनंद सौख्य भरभराट घेऊन येणार आहे.
अहंकार आयुष्याची माती करतो
शनिला तेलाचा अभिषेक, हनुमानाला रुईचा हार, शेंदूर अर्पण करायचाच आहे, पण त्याही पेक्षा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या पायावर आपला अहंकार समर्पित करायचा. अहंकार आयुष्याची माती करतो आणि ज्याला माज अहंकार आहे त्याला शनिची अत्यंत कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही . आता प्रत्येकाने ठरवायचे की, काय समर्पित करायचे, काय घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे.
॥ बजरंगबली की जय ॥
॥ जय श्रीराम ॥