शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवला तसा आपला देवावर खरा विश्वास आहे का?... वाचा, एका छोट्या मुलीची गोष्ट

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: September 21, 2020 12:33 IST

अर्जुनाने, श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा, असे म्हटले. याला म्हणतात विश्वास!

ज्योत्स्ना गाडगीळ.

आपण म्हणतो, की देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण संकटकाळी जेव्हा देव आपली परीक्षा घेतो, आपल्याला एकटे सोडतो, तेव्हा अचानक तो विश्वास डळमळीत होऊ लागतो. एवढेच नाही, तर आपण त्याचे अस्तित्वही नाकारतो. मग याला विश्वास म्हणायचे का?

महाभारतात १०० कौरवांसमोर ५ पांडवांचा विजय झाला, का? कारण साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी होता. तेच जर, दुर्योधनाने श्रीकृष्णाला मागून घेतले असते, तर कदाचित वेगळाच इतिहास घडला असता. मात्र, दुर्योधनाने कृष्णापेक्षा त्याच्या अठरा औक्षहणी सैन्यावर विश्वास दाखवला आणि परमात्म्याचा संग नाकारला. याउलट अर्जुनाने, श्रीकृष्णावर विश्वास दाखवला आणि तुझे सैन्य नको, फक्त तू सोबत हवा, असे म्हटले आणि त्याच्या मार्गदर्शनाने विजय मिळवला.असा विश्वास असायला हवा. हेच सांगताना, साधू गौर गोपाल दास प्रभू सुंदर गोष्ट सांगतात....

हेही वाचाः तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी

एकदा एका विमानप्रवासात सगळे प्रवासी शांतपणे झोपले होते. अचानक विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांना सूचना मिळेपर्यंत विमान हवेत हेलकावे खाऊ लागले. एका क्षणी तर विमान १८० अंशात आकाश-पाताळाला समांतर झाले. सर्व प्रवाशांना वाटले, पुढचा क्षण आपण बघणार नाही. सगळे आरडा- ओरड करू लागले. रडू लागले. पायलटला दोष देऊ लागले. एकूणच सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. 

मात्र, त्याच वेळी एक लहान मुलगी अजिबात भांबावून न जाता आपले गोष्टीचे पुस्तक छातीशी कवटाळून लोकांकडे बघत होती आणि हसत होती. ही गोष्ट एका माणसाच्या लक्षात आली. 

देवकृपेने काही क्षणातच विमान स्थिरस्थावर झाले आणि सुरक्षित ठिकाणी उतरवले गेले. सर्व प्रवासी देवाचे आभार मानत, एकमेकांचे अभिनंदन करत विमानातून उतार झाले. ती छोटी मुलगी, आपला सीट बेल्ट काढून उतरायला निघाली, तेव्हा त्या व्यक्तीने तिला थांबवून विचारले, 'बेटा, मगाशी एवढे लोक घाबरले असताना, आरडा-ओरड करत असताना, तू अगदी शांतपणे सर्वांकडे पाहत होतीस आणि नंतर काहीही न घडल्यासारखी पुन्हा पुस्तक वाचू लागलीस. तुला घडलेल्या प्रसंगाची भीती नाही वाटली?'

हेही वाचाः देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै

हेही वाचाः तुझ्याविण जाऊ कुणा शरण..!

त्यावर ती मुलगी पुन्हा हसून म्हणाली, 'कसली भीती काका? या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत, त्यामुळे सर्वांपेक्षा जास्त, त्यांना माझी काळजी असणार आणि ते आहेत म्हटल्यावर मला काहीच नाही होणार, याची मला खात्री होती.'

याला म्हणतात विश्वास! असा विश्वास आपण देवावर दाखवतो का, हे तपासून पाहायला हवे.