शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शुभ बोल नाऱ्या... असे आपण दुसऱ्यांना सांगतो आणि स्वतः मात्र???

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 15:13 IST

वाईट गोष्टींचे उच्चारण तर नकोच, पण वाईट गोष्टींचा विचारही नको. 

दिवसेंदिवस वाढती स्पर्धा, महागाई, बेरोजगारी,गुन्हेगारी अशा वातावरणात आपल्या मनावरदेखील नैराश्याचे मळभ आले नाही तर नवल? कधी कधी आपणही या नैराश्याच्या गर्तेत अडकतो आणि व्यर्थ बडबड करू लागतो. नैराश्याच्या भरात नकारात्मक विचार उगाळत बसतो. परंतु जे विचार आपण पेरतो, तेच विचार भविष्यात उगवून आपल्या समोर येतात. म्हणून बोलायचे असेल तर चांगलेच बोला. वाईट विचारांना मनातही थारा नको. 

हिंदी चित्रपटातला अभिनय डोळ्यासमोर आणा. एखादा नायक जेव्हा निर्वाणीची भाषा बोलतो, तेव्हा नायिका त्याचा शब्द मध्यातून तोडत वाईट बोलू नको असे नजरेनेच सांगते. दिसायला रोमँटिक वाटणारा हा सिन वास्तवाची जाणीव करून देणारा आहे. 

मोकळ्या निसर्गात जा. विशेषतः इको पॉईंटला! तिथे मोठ्याने हाक मारली असता, तो आवाज प्रतिध्वनी होऊन आपल्यालाच ऐकू येतो. त्याचप्रमाणे आपण जे जे काही बोलतो, ते हा निसर्ग शोषून घेतो आणि आपण जाणते अजाणते पणी बोललेल्या गोष्टी आपल्या समोर आणून ठेवतो. म्हणून वाईट गोष्टींचे उच्चारण तर नकोच, पण वाईट गोष्टींचा विचारही नको. 

तुम्ही जेव्हा म्हणता, आज थकल्यासारखे वाटत आहे, झोप येतेय, कामाचा कंटाळा आला आहे, खूप उदास वाटत आहेत. हे नकारार्थी विचार मनाद्वारे शोषले जाऊन मेंदूवर परिणाम करतात आणि देहाला तशा सूचना देतात, त्यामुळे आपण जसा विचार करतो, तसे आपल्याला जाणवू लागते. वास्तविक तसे नसते. ती तात्कालिक घटना असते. जी मनावर परिणाम करते आणि त्याचा संबंध आपण कृतीशी जोडतो. 

निसर्ग अनंत करांनी आपल्याला हवे ते द्यायला बसलेला आहे. त्याच्याकडून पहिली गोष्ट घ्यायची, ती म्हणजे सकारात्मकता! पानगळतिच्या मौसमातही निसर्ग कधीच उदास दिसत नाही. हेही दिवस जातील असा संदेश देत तो काही काळात नवे रूप धारण करतो. निसर्गाला हे शक्य आहे तर आपल्याला का नाही? त्यासाठी आधी स्वतःला वाईट गोष्टी बोलण्यापासून, विचार करण्यापासून आणि कृती करण्यापासून रोखल्या पाहिजेत. 

दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी 'मी आनंदी आहे', 'मी समाधानी आहे', 'मी स्वतःला सिद्ध करू शकतो', 'मी लढू शकतो', 'मी सुखात राहू शकतो', 'मी दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो' ही साधी सोपी आणि काहीशी कृत्रिम वाटणारी विधाने तुमच्या मनावर आणि देहावर प्रचंड सकारात्मक परिणाम करतात. सुरुवातीला त्यात तथ्य वाटणार नाही. पण हळू हळू सरावाने या वाक्यांची ताकद तुमच्याही लक्षात येईल. रागाच्या, नैराश्याच्या, विरहाच्या क्षणी दीर्घ श्वास घ्या आणि आत्मविश्वासाने स्वतःला सांगा, 'या परिस्थितीवर मात करूनही मी पुढे जाईन' मग परिणाम बघा. तुमचे झुकलेले खांदे आपोआप ताठ होतील आणि नैराश्याची जागा आत्मविश्वास घेईल. 

या जगात अशक्य काहीही नाही. त्यासाठी फक्त दुसर्यांऐवजी स्वतःला सांगायला सुरुवात करा...'शुभ बोल नाऱ्या...!'