शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

Astro Tips: रागावर नियंत्रण राहत नाही? सप्तशतीचे पाठ करा, लाभ मिळवा; वाचा नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 11:43 IST

Astro Tips: सद्यस्थितीत प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे एवढे वाढले आहेत की त्याचे पर्यवसान नातं तुटण्यात होते; रागाचे हे टोक गाठण्याआधी वाचा दिलेला उपाय!

>>दिप्ती जोशी, (मास्टर टॅरो अंकशास्त्र रेकी क्रिस्टल कुंडली मार्गदर्शक)

सप्तशतीतले अनेक मंत्र प्रासादिक आहेत. ती मंत्रसिद्धी मिळावी यासाठी नियमही पाळायला हवेत. जर तुम्ही रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी, इतरांशी वादविवाद थांबवण्यासाठी, नात्यात माधुर्य आणण्यासाठी हे मंत्रोच्चार करणार असाल तर जाणून घ्या नियम. 

  • सप्तशती पाठ सुरू करण्याआधी गुरुदेव, कुलदेवी, कुलदैवत नी गणपती बाप्पा ह्यांचे मंत्र जप म्हणून त्यांचे आशीर्वाद घेऊन, त्यांना सांगा, 'मी सप्तशती पाठ करत आहे, ते पूर्णत्वास न्यावे.'  
  • माता भगवतीची आराधना करावी नी महादेव मंत्राची एक माळ जप करावा.
  • सुरुवातीला पोथी मध्ये सगळ लिहिलेलं आहे त्यामुळे न्यास , कवच स्तोत्रं विधिवत म्हणावीत. 
  • नवार्ण मंत्र जपाची तीन माळ पाठ सुरू करण्याआधी नी पाठ संपल्यावर म्हणावे.
  • तेच महादेव ह्यांच्या मंत्राच आहे. 
  • सगळं म्हणून झाल्यावर क्षमा याचना श्लोक म्हणावा. 
  • ते  पूर्ण झाल्यावर, उठण्याआधी आसनावरून चारही दिशांना पाणी शिंपडावे, नी आसनाच्या खाली एक पळी पाणी सोडावे. त्यांनतर डोळ्यांना पाणी लावावे. माथ्यावर कपाळावर पाणी लावावे नी इंद्र देवतांची प्रार्थना करावी. 'हे इंद्र देवता मी जे काही मंत्र जप, पूजा पाठ केला आहे त्यातून जी ऊर्जा मला मिळाली आहे नी पुण्य साठले आहे ते माझे मला मिळू दे.'
  • तीन वेळा माथ्यावर हात ठेवून 'शक शकाय नमः' म्हणावे. 
  • आपले आसन, जप माळ ही नेहमी वेगळी असावी. एकमेकांचे वापरू नये. 
  • पाठ म्हणताना किंवा जप करताना पुरुषांनी रुमाल /टोपी घालावी. 
  • स्त्रियांनी साडीचा पदर किंवा ओढणी डोक्यावरून घ्यावी. 
  • आरती करावी, प्रसाद देवीचा सगळ्यांना द्यावा. 
  • मांसाहार मद्यपान कांदा लसूण खाऊ नये. शक्य असल्यास फल आहारावर रहावे. अथवा एक वेळ जेवावे.
  • जमल्यास रोज एका चांदीच्या तांब्यात किंवा काचेच्या गलासात पाणी भरून ठेवावे. सगळं पूर्ण झाल्यावर ते पाणी प्यावे. वॉटर चार्जचा अनुभव ह्या सकारात्मक शक्तींनी येईल.
  • आताशी सुरुवात केली असेल म्हणजे पहिल्यांदाच तर घाबरून जाऊ नका. सप्त शती, नवनाथ पारायण, किंवा कोणत्याही मंत्र जप अनुष्ठान करून सुरुवात केल्यावर प्रत्येक जातकाला हा अनुभव येतोच, पण कोणत्याही स्थितीत संकल्प तुटू देऊ नका. निगेटिव्ह शक्ती बाधा आणतात. पूर्ण पाठ करा. कितीही कलह झाला तरी खंड पडून देऊ नका.
  • जस जसे तुमचे पारायण महिन्यातून एकदा दोनदा व्हायला लागेल, नेहमी होत राहील, तस तसा तुम्हाला फरक जाणवेल. ९-११ पारायण झालं की ही नकारात्मकता कमी होऊन वास्तूत चैतन्य निर्माण होईल.
  • फक्तं पारायण पूर्ण झालं की कुमारी भोजन, त्यांना यथा शक्ती वाण,ब्राह्मण भोजन ई होऊ दे, म्हणजे संकल्प लवकर पूर्ण होतो. कुमारिका पूजनाने देवी प्रसन्न होते. यथासांग सगळ केलं की.नी मनातील ईच्छा फलित होतात.
  • सगळ्यात महत्वाचं, कोणतीही साधना जप तप ह्यावेळी आपल्या धर्म शास्त्रात मौनाला खूप महत्व दिले आहे त्यामुळे जितकं मौन व्रत पाळता येईल तेवढे पाळावे. भगवती किंवा कुलदेवी मंत्र जप त्या काळात सतत सुरू ठेवावा. मौन व्रत ह्यासाठी सांगितले आहे जेणेकरून निर्माण झालेली ऊर्जा बोलण्याने क्षय होऊ नये. 
टॅग्स :Astrologyफलज्योतिष