शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

गतवर्षीच्या लाॅकडाऊनमधील मदतीचे हात गेलेत कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

सखाराम शिंदे गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावला होता. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य ...

सखाराम शिंदे

गेवराई : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी संपूर्ण देशात लाॅकडाऊन लावला होता. त्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या सर्वसामान्य कामगार व इतरांना काम नसल्याने खायची पंचायत झाली होती. त्यामुळे शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी व राजकीय पक्षाने तब्बल तीन महिने नागरिकांना घरपोहोच खाण्याची व्यवस्था व किराणा कीटसह विविध प्रकारे मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. यावर्षी मदतीचे हे हात आता कुठे दिसत नाहीत.

आता पुन्हा जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन सुरू झाला. दुसरा दिवस उजाडला तरी अजून शहरातील सामाजिक व राजकीय पक्षाने कसलीच मदतीची व खाण्याची सोयदेखील केली नसल्याचे चित्र सध्या शहरात पहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात कडक लाॅकडाऊन लावण्यात आल्याने सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. यात हातावर पोट भरणाऱ्या रोजंदारी मजूर, रिक्षाचालक, वडापाव, फळविक्रेत्यांसह अनेकांची कामे बंद झाल्याने व हाताला काम नसल्याने एकवेळची खायची पंचायत झाली होती. अशा वेळेला माजी आ.अमरसिंह पंडित याच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठानने शहरातील व ग्रामीण भागात महिनाभर पुरेल एवढ्या किराणा मालाच्या किटचे हजारो कुटुंबाला घरपोहोच वाटप केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक व्हेंटिलेटर दिले होते. तसेच संदीप मुळे व मित्र परिवाराने तीन महिने शहरातील विविध भागांत राहणाऱ्या गरीब कुटुंबाला घरपोहोच खिचडीचे वाटप केले.

संदीप पाडुळे, शिवस्वराज्य प्रतिष्ठान, शाहिनबग यांनी घरी जाऊन जेवणाची सोय केली होती. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अक्षय पवार याच्या वतीने सॅनिटाझर, मास्क व किराणा किटचे आदी मदतीचे वाटप केले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनीदेखील किराणा किटचे वाटप केले होते. तसेच युवक काँग्रेसचे श्रीनिवास बेदरे, बाळासाहेब सानप यांनीदेखील मदत केली, तर काहींनी मुक्या जनावरांच्या चाऱ्यांची सोय केली होती. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबाला या सर्वांमुळे आधार मिळाला होता. मात्र आता पुन्हा जिल्ह्यात दहा दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात आला व दुसरा दिवस उजाडला तरी शहरातील व तालुक्यातील अनेक हातांवर पोट असणाऱ्यांचे कामे बंद झाली असल्याने आता खायचे काय? असा प्रश्न या कुटुंबावर येऊन ठेपला. असे असतानाही शहरातील व तालुक्यातील एकही राजकीय पक्षाचे वा सामाजिक संघटनेचे कोणीही अजून तरी पुढे आले नाहीत. सामाजिक संघटनांनी व राजकीय नेत्यांनी तसेच कार्यकत्यांनी पुढे येऊन गरीब कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी सर्व सामान्यांमधून होत आहे.

===Photopath===

270321\20200401_174644_14.jpg

===Caption===

गेल्या वर्षीचे लॉडाऊनमध्ये गेवराईत संदिप मुळे यांच्या वतीने खिचडी वाटप झाले होते.