शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार फूल; मास्क मात्र गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST

अमोल जाधव नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे ...

अमोल जाधव

नांदुरघाट : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, राज्य सरकार यावर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मंगल कार्यालये, सिनेमागृह, सामूहिक विवाह सोहळे, सभा धार्मिक कार्यक्रम यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. असे असताना जिल्ह्यातील आठवडी बाजारात कोणतेच नियम पाळले जात नाहीत.

कार्यक्रमाच्या दहापट गर्दी करून ग्रामीण भागात बाजार भरून गर्दी केली जाते; परंतु त्यांना सूचना द्यायला किंवा सांगायला कोणीच नसते. नांदुरघाट येथे मंगळवारी आठवडी बाजार होता; परंतु बाजारात बहुतांश व्यापाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. ते पाहून बाजारात परिसरातील आलेले लोक हे विना मास्क व गर्दी करून दिसले. त्यामुळे आज दिवसभर नांदुरघाटचा बाजार फूल होता; परंतु मास्कबाबत प्रत्येक माणूस गूल होता. नांदूरघाटच्या आठवडी बाजारात ग्रामपंचायतने कोणतेच नियोजन अथवा सूचना केल्याच्या दिसून आल्या नाहीत. शहरामध्ये नगर परिषद मास्क नसेल तर दंड पोलिसांच्या मदतीने वसूल करत आहे व सवय लावत आहे. लॉकडाऊन पडल्यावर गोरगरिबांचे मोठे व व्यापाऱ्यांचे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीने बाजारामध्ये कडक नियम करून सवय लावायला पाहिजे. गर्दी असली तरी त्या ठिकाणी प्रत्येक जण मास्क लावून बोलला तर संसर्ग पसरण्याचा धोका कमी होईल जर अशीच निष्काळजी स्थानिक पातळीवर झाली तर रोज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल व पुन्हा नियंत्रणात येणार नाही.