शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कचऱ्यावरून बीडमध्ये नागरिक-पालिकेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:42 IST

ओला व सुका कचरा वेगवेगळा द्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन करत डोअर टू डोअर जाणाºया नगर पालिका कर्मचाºयांसोबत काही नागरिक वाद घालत असल्याचे समोर आले आहे. कचरा वेगवेगळा देण्यात त्यांना कमीपणा वाटत असून तुम्हीच कचरा वेगळा करा नाही तर आम्ही आमचा कचरा कोठेपण टाकू, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहेत. यावरून नागरिक शहर स्वच्छतेसाठी किती पुढाकार घेतात, हे दिसून येते. काही नागरिकांच्या असहकार्यामुळेच स्वच्छ शहर ‘घाण’ बनत चालले असून यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

ठळक मुद्देओला व सुका कचरा करण्यात कमीपणा; ‘इगो प्रॉब्लेम’ मुळे तू तू मैं मैं... !

बीड : ओला व सुका कचरा वेगवेगळा द्या आणि शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन करत डोअर टू डोअर जाणाºया नगर पालिका कर्मचाºयांसोबत काही नागरिक वाद घालत असल्याचे समोर आले आहे. कचरा वेगवेगळा देण्यात त्यांना कमीपणा वाटत असून तुम्हीच कचरा वेगळा करा नाही तर आम्ही आमचा कचरा कोठेपण टाकू, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून समोर येत आहेत. यावरून नागरिक शहर स्वच्छतेसाठी किती पुढाकार घेतात, हे दिसून येते. काही नागरिकांच्या असहकार्यामुळेच स्वच्छ शहर ‘घाण’ बनत चालले असून यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नगर पालिकेकडून कडक पाऊले उचलले जात आहेत. सकाळी पाच वाजेपासूनच सर्व अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. तसेच मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी प्रत्येक प्रभागात विशेष पथके नियुक्त केले आहेत. या पथकांकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन करण्याबरोबरच नागरिकांना माहिती दिली जात आहे. तोटे - फायदे सांगितले जात आहेत. तसेच ज्याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्यावर तात्काळ कार्यवाहीही केली जात असल्याचे दिसून येते. परंतु काही नागरिक या उपक्रमांत खोडा घालत असल्याचे दिसून येत आहे. पालिकेला सहकार्य करण्याऐवजी ओला व सुका कचरा वेगळा करण्यावरून त्यांच्यासोबत वाद घालत असल्याचे दिसून येत आहे.खडकपु-यामध्ये झाली बाचाबाचीपेठ बीड भागातील खडकपुरा येथे बुधवारी सकाळी पालिका अधिकारी, कर्मचारी कचरा वेगळा करून घेण्याचे आवाहन करीत होते. एवढ्यात काही नागरिकांनी एकत्र कचरा आणून घंटा गाडीत टाकला.यावर अधिकाºयांनी त्यांना रोखले असता ‘तुम्ही ओला व सुका कचरा वेगळा करा, नसेल घेऊन जायचा तर नका घेऊन जाऊ, आम्ही टाकू कोठेपण’ असे म्हणत वाद घातला.यावरून पालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यावरून नागरिकांकडून या मोहिमेत आणखीही अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

दंडाची धमकी; वाद घालणारे गायबकचरा वेगळा करून व इतरत्र कचरा टाकणाºयांना पालिका अधिकाºयांनी कारवाईची धमकी देताच सर्व गायब झाल्याचे दिसून येते. काही नागरिकांच्या अशा वर्तणुकीमुळेच शहर अस्वच्छ होत असल्याचे दिसून येते.

काही नागरिकांकडून सहकार्यकाही भागात नागरिक घरातच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत टाकतात. तसेच इतरांनाही सांगतात. याचा आदर्श घेण्याची गरज असून शहर स्वच्छतेसाठी पालिकेला सहकार्य करावे. फायदा आपल्यालाच असल्याचे पालिकेकडून सांगितले जात असल्याने अनेकांची मानसिकता बदलली आहे.

सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत कर्तव्यसकाळी सहा वाजताच मुख्याधिकारी ते शिपाई असे सर्वच स्वच्छतेच्या कामासाठी बाहेर पडतात. सकाळी जनजागृती करून झाल्यावर दिवसभर कार्यालयीन काम करतात. एरव्ही १०.३० ते ६ असा कार्यालयाचा वेळ आहे. परंतु सध्या हे लोक १२ तास कर्तव्य बजावत आहेत.स्वच्छतेचा सोशल मीडियावरून आढावामुख्याधिकारी डॉ.जावळीकर यांनी पथके नियूक्त केली आहेत. त्यांचा सोशल मीडियावर ‘मिशन २०१९’ असा ग्रुप तयार करून त्यावर दररोज आढावा घेतला जात आहे. तसेच स्पॉटवर गेल्यानंतर सेल्फी काढण्याची तंबी दिल्याने कामचुकारांना आळा बसला आहे. तसेच जे गैरहजर आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे.

कामगार महिलेला धक्काबुक्कीओला व सुका कचरा एकत्र घेतला नाही, म्हणून एका घंटागाडी चालक महिलेला उच्चभ्र वसाहतीतील एका महिलेने धक्काबुक्की केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी सुभाष रोड परिसरात घडली होती.हा प्रकार समजताच स्वच्छता निरीक्षकांनी धाव घेतली होती. परंतु सदरील महिलेवर कसलीच कारवाई न करता हे प्रकरण दडपले. पालिका कर्मचा-यांना काही नागरिकांकडून तुच्छ वागणूक मिळत असल्याने त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMarathwadaमराठवाडा