शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी, गारपिटीने शेतकऱ्यांची थट्टा मांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

तलवाडा : गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची ...

तलवाडा

: गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापूर परिसरात सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.

खरीप अतिवृष्टीने गेल्यानंतर रब्बीवर मदार असलेला शेतकरी रब्बीची पिकेही हातची गेल्याने सुन्न झाला आहे.

२० मार्च रोजी दुपारी प्रचंड गारपीट,पाऊस व वादळवाऱ्यामुळे ऐन काढणीस आलेले हरभरा,गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळली आहेत. तर फळबागांचेही नुकसान झालेले आहे. खरिपाच्या नुकसानीतून सावरण्याआधीच शेतकरी पुन्हा कोलमडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदत मिळणे गरजेचे आहे.

पंचनाम्याचा फार्स नको मदत हवी

गारपीट व प्रचंड पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. याची पाहणी स्थानिक सत्ताधारी, विरोधक तसेच लोकप्रतिनिधींनी केली. मात्र अजूनही अधिकृतपणे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांना मदत देऊन तत्काळ दिलासा द्यावा. पंचनामे, दौरे या भानगडीत वेळ घालवू नये अशी मागणी होत आहे.

पिकांचे मातेरे, फळांचा सडा

गहू,हरभरा,ज्वारीची माती तर फळझाडांखाली फळांचा सडा

प्रचंड व टपोऱ्या गारा, वेगवान वारे व पावसामुळे काढणीस आलेली ज्वारी,गहू ,हरभरा ही पिके मातीत मिसळली आहेत तर फळझाडांच्या खाली फुले,कळ्या व छोट्या फळांचा सडा पडला आहे.

ऑनलाइन चक्रात अडकलाय विमा

खरीप अतिवृष्टीने व रब्बी हंगाम अवकाळी पाऊस व गारपिटीने मातीत गेला. त्यामुळे ऑनलाइन तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा देण्याची भूमिका विमा कंपनीने घेतल्याने त्या किचकट प्रक्रियेमुळे साधा मोबाईल वापरणारे तर सोडा पण ॲन्ड्रॉइड मोबाईलवाले अनेक शेतकरी तक्रारीचा पावती नंबर,ओटीपी,जिओ टॅगचे छायाचित्र जोडताना चक्रावत आहेत.

अस्मानी संकट

टरबूज,खरबूज,भाजीपाल्यांचे तर कुत्रे हाल खाईनात. गहू,हरभरा,ज्वारी या पारंपरिक पिकांपेक्षा टरबूज,खरबूज अशा पिकांना अनेकपट खर्च लागतो. जवळपास एकरी लाखाच्या घरात खर्च असतो. तो खर्च करुन उत्पन्न हाती येण्यावेळीच अस्मानी संकटाने दगा दिल्यामुळे या शेतकऱ्यांचे हाल गंभीर झाले आहेत.

===Photopath===

250321\25bed_3_25032021_14.jpg

===Caption===

 गेवराई तालुक्यातील तलवाडा व राजापुर परिसरांत सलग तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली पिकेही मातीत मिसळली आहेत.