शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘यातना उत्सव’मधून आम्ही सम्यक क्रांतीचे स्वप्न बघितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST

गेवराई : प्रजासत्ताक भारताच्या राज्यघटनेने सर्व समाजाला समान पातळीवर आणलेले आहे, हेच सम्यक क्रांतीचे स्वप्न आम्ही ‘यातना उत्सव’ या ...

गेवराई : प्रजासत्ताक भारताच्या राज्यघटनेने सर्व समाजाला समान पातळीवर आणलेले आहे, हेच सम्यक क्रांतीचे स्वप्न आम्ही ‘यातना उत्सव’ या नाटकामधून बघितल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार प्रा. बापू घोक्षे यांनी केले. येथील महिला महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या अंतिम दिवशी ‘माझी नाट्य लेखनप्रक्रिया’ या विषयावर प्रा. बापू घोक्षे बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांचन परळीकर होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातील असलेल्या ‘यातना उत्सव’ या नाटकाची लेखनप्रक्रिया प्रा. बापू घोक्षे यांनी मांडली. अनुभवकथनासोबतच दलित साहित्य आणि समाजाच्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केले. आपले अनुभवकथन करताना ते म्हणाले, समाजाच्या वर्णसत्ताधारित किंवा धर्मसत्ताधिष्ठित विषमतावादी संस्कृतीला महान कसे म्हणता येईल? मानवाचे निसर्गदत्त माणूसपण नाकारणारी संस्कृती एकसंध मानवतावाद कसा उभा करू शकेल, असे प्रश्न उभे करीत त्यांनी संस्कृतीचा गतिमान रथ आता क्रांतीच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात जाळल्या गेलेल्या एका दलित वस्तीचे भग्नावशेष बघून मला ‘यातना उत्सव’ ही नाट्यकृती लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचेही प्रा. बापू घोक्षे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात प्रा. नामदेव शिनगारे यांनी दलित रंगभूमी-साहित्याचा आढावा घेत प्रा. बापू घोक्षे यांच्या समग्र साहित्याची चर्चा केली. सूत्रसंचालन प्रा. डॉ संजय भेदेकर यांनी केले. प्रा. डॉ प्रवीण शिलेदार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ प्रवीण शिलेदार, प्रा. रामहरी काकडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्राध्यापक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.