शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २३८ लाचखोर मोकाटच, एसीबीचा ट्रॅप पडूनही निलंबन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:22 IST

बीड : सामान्यांकडून लाच स्वीकारताना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित असते; परंतु राज्यात तब्बल ...

बीड : सामान्यांकडून लाच स्वीकारताना लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित असते; परंतु राज्यात तब्बल २३८ लाचखोर अद्यापही मोकाटच असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही. यात ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. या २३८ मध्ये वर्ग १ चे २४, तर वर्ग २ च्या २१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसीबीच्या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

राज्यात लाच स्वीकारणाऱ्या सरकारी बाबूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात ग्रामपंचायतीच्या शिपायापासून ते अपर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे लोकसेवक २०० रुपयांपासून ते ४ लाखांपर्यंत लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. कारवाई झाल्यानंतर एसीबीकडून संबंधित विभागाला तत्काळ पत्र पाठवून कारवाई केल्याचा अहवाल पाठविण्यास सांगितले जाते; परंतु ग्रामविकास, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, महसूल, सहकार, पणन, भूमिअभिलेख, नगरविकास आदी विभाग या पत्राला केराची टोपली दाखवून या लाचखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. राज्यातील अशाच २३८ लाचखोरांना अद्यापही संबंधित विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी निलंबित केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

चौकट,

नांदेड, नागपूर परिक्षेत्र अव्वल

कारवाई झाली, परंतु निलंबित न केलेल्या यादीत नागपूर व नांदेड परिक्षेत्र अव्वल आहे. नागपूर व नांदेड येथे प्रत्येकी ५६ लोकांना अद्यापही निलंबित केलेले नाही. त्यापाठोपाठ औरंगाबाद ३३ व अमरावती २८ यांचा क्रमांक लागतो.

चौकट,

पोलिसांत कारवाई, इतरांना अभय का?

एसीबीची कारवाई होताच पोलीस खात्यात संबंधितांवर निलंबनाची कारवाई केली जाते. पोलिसांत ज्या वेगाने कारवाई होते, तशी कारवाई इतर विभागात का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांची चौकशी होणे अपेक्षित असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोट,

एसीबीच्या संकेतस्थळावरील माहिती अपडेट असते. एखाद्या लोकसेवकावर कारवाई होताच तत्काळ संबंधित विभागाला पत्र देऊन कारवाईचा अहवाल मागविला जातो. निलंबनाचे अधिकार त्या त्या विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याला असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. शासन निर्देशानुसार आम्ही प्रक्रिया पूर्ण करतो.

- डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, एसीबी औरंगाबाद

आकडेवारी

निलंबित न केलेले अधिकारी, कर्मचारीवर्ग १ - २४

वर्ग २ - २१

वर्ग ३- ११७

वर्ग ४ - ७

इतर लोकसेवक - ६९

एकूण - २३८

------

परिक्षेत्रनिहाय आकडेवारी

मुंबई - २२

ठाणे - २७

पुणे - १३

नाशिक - ३

नागपूर - ५६

अमरावती - २८

औरंगाबाद - ३३

नांदेड - ५६