शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

ते सर्व आरोप बिनबुडाचे..; धनंजय मुंडेंसाठी भाऊ मैदानात, सुरेश धसांवर केली जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:08 IST

'आम्ही अजून किती दिवस गप्प बसायचे होते? धनंजय मुंडेंसारखे नेते तयार व्हायला 20 वर्षे लागली. त्यांची नाहक बदनामी केली जात आहे.'

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या क्रुर हत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडची प्रमुख भुमिका असल्यामुळे भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सातत्याने मुंडेंवर टीका करत आहेत. या प्रकरणामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. आता धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडे (Ajay Munde) भावासाठी मैदानात उतरले असून, त्यांनी सुरेश धसांवर जोरदार टीका केली.

सुरेश धसांचे बिनबुडाचे आरोप अलीकडेच आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंच्या कौटुंबिक बाबींवर टीका केली होती. त्यानंतर आता अजय मुंडेंनी आज पत्रकार परिषद घेऊन धसांचे सर्व आरोप फेटाळून लावले. 'सुरेश धसांनी एका वृत्त वहिनीवर मुलाखत दिली. त्यात धनंजय मुंडे साहेबांची आई त्यांच्यासोबत राहत नाही, असे चुकीचे वक्तव्य केले. सुरेश धस हे मुलाखतीत धनंजय मुंडेंच्या आईबद्दल बोलत आहेत. त्या परळीला आल्या नाही, त्यांचे चुलत भाऊ नाराज आहेत. कौटुंबिक कलह असल्याचा त्यांनी आरोप केला. पण आमच्या बाई परळीत राहत होत्या. मात्र त्या आता गावी राहत आहे. धनंजय मुंडेदेखील आईसोबतच राहतात. सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे आहेत,' अशी प्रतिक्रिया अजय मुंडेंनी दिली.

सुरेश धस धुतल्या तांदळाचे नाहीत...अजय मुंडे पुढे म्हणतात, 'आम्ही अजून किती दिवस गप्प बसायचे होते? धनंजय मुंडेंसारखे नेते तयार व्हायला 20 वर्षे लागली. त्यांच्यावर आरोप नसताना नाहक बदनामी केली जात आहे. सध्या आमच्या परळीतील घराचे काम सुरू आहे, त्यामुळे मुंडे साहेब आणि बाई गावी राहत आहेत. आपल्या जन्मगावात जाऊन राहणे गुन्हा आहे का? सुरेश धस किती धुतल्या तांदळाचे आहेत, हे माहीत आहे. त्यांना आरोप करायला काही शिल्लक नाही, म्हणून कौटुंबिक आरोप केले जात आहेत. आम्ही किती सहन करायचे?' 

आरोप करून पळून जातात'आज आमच्यावर कौटुंबिक आरोप केले जात आहेत, मात्र त्याला काहीही अर्थ नाही. आम्ही किती दिवस शांत बसायचे? कोणीतरी बोलले पाहिजे, म्हणून मी इथे बोलायला आलो आहे. आज कुटुंबावर आरोप केले, म्हणून मी पुढे येऊन बोलत आहे. आमचे शंभर-दिडशे टिप्पर आहेत, असा आरोप सुरेश धसांनी केला. पण, ते नेहमी आरोप करून पळून जातात, त्यांनी पुरावे सादर करावे. आज त्यांचा खोक्या बाहेर पडला, या खोक्याचा आका कोण आहे? ते स्वतःच म्हणतात की, हा त्यांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा कार्यकर्ता दोनशे हरणं मारुन खातो. यात सुरेश धसांना सहआरोपी करायला पाहिजे,' अशी मागणीही अजय मुंडेंनी केली.

संतोष देशमुखांना न्याय मिळावाअजय मुंडे म्हणतात, 'संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची आधीपासून भूमिका आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनीदेखील यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे आम्ही यावर जास्त भाष्य करणार नाही, न्यायालयाचा अवमान करणार नाही. पण, संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, हीच आमची इच्छा आहे. मुंडे कुटुंब आरोपींच्या मागे आहे, असे समजू नये. जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. आमच्यावरील आरोप राजकारणाने प्रेरित आहेत. या घटनेचे कुणीही समर्थन करू शकत नाही. परळीची नाहक बदनामी केली जातीये,' असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

काय म्हणाले होते सुरेश धस? सुरेश धसांनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, धनंजय मुंडे वाल्मीक कराडच्या संपूर्ण आहारी गेले आहेत. वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंना काही शिल्लक ठेवले नाही. धनंजय मुंडेंच्या घरातले या प्रकारामुळे थोड्याफार प्रमाणात नाराज आहेत. त्यांनी घरातल्या कोणाचेच काही चालू दिले नाही. धनंजय मुंडेंच्या आई दीड वर्षापासून नाथऱ्याला राहायला गेल्या आहेत, असा दावा धसांनी केला होता. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेwalmik karadवाल्मीक कराडSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडSuresh Dhasसुरेश धस