शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?

By सोमनाथ खताळ | Updated: February 4, 2025 12:14 IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

बीड : २०२३ मध्ये जिल्ह्यात ६४ जणांची हत्या झाली. यातील ६० गुन्हे उघड झाले, परंतु अद्यापही चार गुन्हे उघड झालेले नाहीत. सध्या तरी परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचीच चर्चा सुरू असून, इतर तीन खुनांबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांनाही हे गुन्हे उघड करून मारेकरी कोण? याचा तपास लावण्यात अपयश आले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले. २०२३ मध्ये ६४ खुनांचे गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये यात घट होऊन तो आकडा ४० वर आला. हे सर्व गुन्हे उघड करण्यातही बीड पोलिसांना यश आले, परंतु २०२३ मधील गुन्ह्यांना दोन वर्षे उलटले, तरी अद्यापही त्यातील मारेकरी शोधण्यात बीड पोलिस यशस्वी झालेले नाहीत. सध्या परळीतील महादेव मुंडे या खून प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. भाजपचे आ. सुरेश धस यांनी यात अनेक गंभीर आरोपही केले. त्यामुळे याचा तपास अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी चाेरमले यांच्याकडे देण्यात आला, परंतु इतर तीन गुन्हे अद्यापही उघड झालेले नाहीत. त्यांच्या तपासाचे आणि मारेकऱ्यांचे काय?, त्यांच्याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांकडून हे प्रकरण कायम तपासावर ठेवून याची फाइल जवळपास बंद केली आहे. त्यामुळे नेकनूर, अंभोरा आणि बर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत.

२०२१, २०२२ मधील खूनही अनडिटेक्ट२०२१ साली माजलगाव शहर (एफआयर क्रमांक - ३८९/२०२१) आणि २०२२ साली अंबाजोगाई ग्रामीण (एफआयर क्रमांक - ४४/२०२२) पोलिस ठाण्यातील खुनाचे गुन्हे उघड झालेले नाहीत. चाेरी, घरफोडी या गुन्ह्यांच्या तपासाचा टक्काही असमाधानकारक आहे. त्यात खुनाचे गुन्हेही उघड होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून मात्र योग्य तपास झाल्यासचा दावा करत ‘अ फायनल’, म्हणजेच कायम तपासावर असल्याचे सांगत दुर्लक्ष केले जात आहे.

प्रकरण १पोलिस ठाणे - बर्दापूरएफआयर क्रमांक - २०/२०२३दिनांक - १२ फेब्रुवारी २०२३हकीकतअंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथील काशिनाथ बारीकराव उजगरे (वय ६०) यांचा ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कशानेतरी गळा आवळून खून केला होता. पत्नी पंचशिला उजगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

प्रकरण २पोलिस ठाणे - अंभोराएफआयर क्रमांक - २३/२०२३दिनांक - १९ फेब्रुवारी २०२३हकीकतआष्टी तालुक्यातील वेलतुरी शिवारात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता, त्याला गळा आवळून मारल्याने नाक, तोंडातून रक्त आले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, परंतु त्याची ओळख पटली नाही. मृतदेह ओळखण्यातच अपयश आल्याने मारेकरी अद्यापही मोकाटच आहे. हवालदार लुईस पवार यांनी या प्रकरणात फिर्याद दिलेली आहे.

प्रकरण ३पोलिस ठाणे - नेकनूरएफआयर क्रमांक - १२७/२०२३दिनांक - २४ मे २०२३हकिकतबीड तालुक्यातील कवलीवस्ती मुळूकवाडी येथील गोरख ढास यांचा मृतदेह २६ मे २०२३ रोजी घरामागील नांगरटीत आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आला होता. शिवाय बाजूला मेलेली काेंबडी आणि एक पिशवीही आढळली होती. पत्नी रूक्मिनबाई ढास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. याचा तपासही अद्याप लागलेला नाही.

प्रकरण ४पोलिस ठाणे - परळी शहरएफआयर क्रमांक - १९१/२०२३दिनांक - २२ ऑक्टोबर २०२३हकिकतपरळी शहरातील बँक कॉलनी भागातील महादेव मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी अशोक मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. अद्यापही यातील मारेकरी शोधलेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड