शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

परळीचे महादेव मुंडेच काय, पण बीडमधील या चार खुनांचा पोलिसांना होईना उलगडा?

By सोमनाथ खताळ | Updated: February 4, 2025 12:14 IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

बीड : २०२३ मध्ये जिल्ह्यात ६४ जणांची हत्या झाली. यातील ६० गुन्हे उघड झाले, परंतु अद्यापही चार गुन्हे उघड झालेले नाहीत. सध्या तरी परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचीच चर्चा सुरू असून, इतर तीन खुनांबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांनाही हे गुन्हे उघड करून मारेकरी कोण? याचा तपास लावण्यात अपयश आले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यातील गंभीर गुन्हे चव्हाट्यावर येऊ लागले. २०२३ मध्ये ६४ खुनांचे गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये यात घट होऊन तो आकडा ४० वर आला. हे सर्व गुन्हे उघड करण्यातही बीड पोलिसांना यश आले, परंतु २०२३ मधील गुन्ह्यांना दोन वर्षे उलटले, तरी अद्यापही त्यातील मारेकरी शोधण्यात बीड पोलिस यशस्वी झालेले नाहीत. सध्या परळीतील महादेव मुंडे या खून प्रकरणाची राज्यभर चर्चा होत आहे. भाजपचे आ. सुरेश धस यांनी यात अनेक गंभीर आरोपही केले. त्यामुळे याचा तपास अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी चाेरमले यांच्याकडे देण्यात आला, परंतु इतर तीन गुन्हे अद्यापही उघड झालेले नाहीत. त्यांच्या तपासाचे आणि मारेकऱ्यांचे काय?, त्यांच्याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही. पोलिसांकडून हे प्रकरण कायम तपासावर ठेवून याची फाइल जवळपास बंद केली आहे. त्यामुळे नेकनूर, अंभोरा आणि बर्दापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अजूनही मोकाटच आहेत.

२०२१, २०२२ मधील खूनही अनडिटेक्ट२०२१ साली माजलगाव शहर (एफआयर क्रमांक - ३८९/२०२१) आणि २०२२ साली अंबाजोगाई ग्रामीण (एफआयर क्रमांक - ४४/२०२२) पोलिस ठाण्यातील खुनाचे गुन्हे उघड झालेले नाहीत. चाेरी, घरफोडी या गुन्ह्यांच्या तपासाचा टक्काही असमाधानकारक आहे. त्यात खुनाचे गुन्हेही उघड होत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून मात्र योग्य तपास झाल्यासचा दावा करत ‘अ फायनल’, म्हणजेच कायम तपासावर असल्याचे सांगत दुर्लक्ष केले जात आहे.

प्रकरण १पोलिस ठाणे - बर्दापूरएफआयर क्रमांक - २०/२०२३दिनांक - १२ फेब्रुवारी २०२३हकीकतअंबाजोगाई तालुक्यातील बाभळगाव येथील काशिनाथ बारीकराव उजगरे (वय ६०) यांचा ८ ते ११ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कशानेतरी गळा आवळून खून केला होता. पत्नी पंचशिला उजगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

प्रकरण २पोलिस ठाणे - अंभोराएफआयर क्रमांक - २३/२०२३दिनांक - १९ फेब्रुवारी २०२३हकीकतआष्टी तालुक्यातील वेलतुरी शिवारात १६ फेब्रुवारी २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता, त्याला गळा आवळून मारल्याने नाक, तोंडातून रक्त आले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, परंतु त्याची ओळख पटली नाही. मृतदेह ओळखण्यातच अपयश आल्याने मारेकरी अद्यापही मोकाटच आहे. हवालदार लुईस पवार यांनी या प्रकरणात फिर्याद दिलेली आहे.

प्रकरण ३पोलिस ठाणे - नेकनूरएफआयर क्रमांक - १२७/२०२३दिनांक - २४ मे २०२३हकिकतबीड तालुक्यातील कवलीवस्ती मुळूकवाडी येथील गोरख ढास यांचा मृतदेह २६ मे २०२३ रोजी घरामागील नांगरटीत आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात दगड मारून खून करण्यात आला होता. शिवाय बाजूला मेलेली काेंबडी आणि एक पिशवीही आढळली होती. पत्नी रूक्मिनबाई ढास यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. याचा तपासही अद्याप लागलेला नाही.

प्रकरण ४पोलिस ठाणे - परळी शहरएफआयर क्रमांक - १९१/२०२३दिनांक - २२ ऑक्टोबर २०२३हकिकतपरळी शहरातील बँक कॉलनी भागातील महादेव मुंडे (वय ३८) यांचा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याप्रकरणी अशोक मुंडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. अद्यापही यातील मारेकरी शोधलेले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड