शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

३०० लेकरांची माय ; बीड जिल्ह्यातील ‘शांतीवन’चा प्रेरणादायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 07:15 IST

संकट, वेदना, संघर्षावर मात करून ३०० लेकरांचा सांभाळ करून दिली मायेची ऊब

- सोमनाथ खताळ

बीड : अडचणीच्या काळात दुकानदार साहित्य उधार देत नव्हते. संक्रांतीला मुलांना गोड जेवण देण्यासाठी काय करावे, असा प्रश्न होता. यावर कसलाही विचार न करता गळ्यातील मंगळसूत्र विकले आणि संक्रांत गोड केली. संकट, वेदना, संघर्षावर मात करून ३०० लेकरांचा सांभाळ करून मायेची ऊब देण्यासह त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य फुलविण्याचे काम आर्वी (ता.शिरूर, जि.बीड) येथील शांतीवन करीत आहे. या प्रकल्पाच्या संचालिका कावेरी दीपक नागरगोजे यांचा हा संघर्षमय प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. 

कावेरी या उच्चशिक्षित. घरची परिस्थिती हलाखीची. सुरूवातीपासूनच नशिबी संघर्ष होता. त्यातच २००० साली मामाचा मुलगा असणाऱ्या दीपक नागरगोजे यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर काही जोडपी फिरण्यासाठी परराज्यात, परदेशात जातात. हे दोघेही बाबा आमटे यांच्या आनंदवनात गेले. तेथील काम समजून घेतले. ते पाहून ते प्रेरित झाले. त्यांनी बाबांजवळ आनंदवनातच काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी नकार दिला. आपल्या परिसरात जा, तेथे काय समस्या आहेत, त्या जाणून घ्या आणि त्यावर काम करा, असा मोलाचा सल्ला दिला. त्याप्रमाणे कावेरी व दीपक दोघेही गावी आले. चार दिवस विचार केला. सामाजिक काम करण्याचे मनाशी ठाम केले आणि २ महिने फिरून पाहणी केली. यामध्ये त्यांना उसतोड कामगार, गरीब, शेतकरी, वंचित, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, तमाशा कलावंतांच्या मुलांची परिस्थिती समजली. त्यांनी २००१ साली ‘शांतीवन’ हा प्रकल्प सुरू केला. सुरुवातीला ५१ मुले होती. तेव्हा केवळ वसतिगृह होते. आता एकूण ३०० मुले (त्यात ८५ मुली) असून १ ली ते १० वी पर्यंत शाळा आणि सर्वांना राहण्यासाठी सुसज्ज असे वसतिगृह आहे. अडचणींवर मात करीत संघर्ष करून उभारलेला हा प्रकल्प कावेरी दीपक नागरगोजे सक्षमपणे चालवित आहेत. 

पतीसह सासूबार्इंचे पाठबळ हा प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी पती दीपक यांचे मोठे पाठबळ होते. तसेच सासू रजनी नागरगोजे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाखमोलाचे ठरले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भगवान भांगे यांनीही सहकार्य केले.

शेततलावातून दुष्काळावर मातसुरूवातीला १० वर्षे खूप अडचणी आल्या. दुष्काळी परिस्थिती. पाण्याचा प्रश्न गंभीर होता. याच वेळी पुण्याचे सुलभा व सुरेश जोशी हे शांतीवनात आले. त्यांनी दाता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. पुण्याचे शशिकांत चितळे यांना प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी प्रकल्पासाठी २५ लाख रूपयांची मदत केली. याच पैशांतून दोन एकरांत शेततलाव खोदला. याच पाण्यावर भाजीपाला पिकविला. त्यामुळे खूप खर्च वाचला. याच खर्चातून मुलांना चांगल्या सुविधा दिल्या.

७ मुले बनताहेत डॉक्टरज्या मुलांना स्वत:चे कपडे घालता येत नाहीत, त्यांच्यापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कावेरी यांनी मातेचे प्रेम दिले. शांतीवनातील शिक्षण संपल्यावर त्यांना अर्ध्यावर सोडून न देता त्यांचा पुढील शिक्षणाचा आणि राहण्या, खाण्याचा खर्चही केला जातो. आज याच प्रकल्पातील सात मुले एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. इतर शाखांचे शिक्षण घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

मुलांच्या शिक्षणासाठी धरले पायसुरुवातीला मुले आर्वी गावातील शाळेत जात होती. मात्र काही लोकांनी त्यांच्या शिक्षणाला विरोध केला. काहींनी उपोषणे केली तर काहींनी शासनाकडे तक्रारी केल्या. यावेळी अनेक वेळा शिक्षक, ग्रामस्थांचे पाय धरावे लागले. मात्र कोणी ऐकले नाही. पण आम्ही खचलो नाहीत. यावर मात केली आणि मुलांना शिक्षण दिले, असे कावेरी यांनी सांगितले.

मी त्यावेळी मंगळसूत्र मोडून मुलांना संक्रांतीच्या दिवशी गोड जेवण दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यातच मी माझे मंगळसूत्र पाहिले. खूप संघर्ष केला. पण आज त्याचे फळ मिळाले. सामाजिक काम केल्याचे समाधान करोडो रूपयांपेक्षा जास्त आहे.  - कावेरी दीपक नागरगोजे संचालिका, शांतीवन प्रकल्प, आर्वी ता.शिरूर, जि.बीड 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेBeedबीडSocialसामाजिक