शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:59 IST

Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. यावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. 

जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

आमदार क्षीरसागर यांनी खंडणीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाला आहे असा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली. 

'एबीपी माझा' या वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार क्षीरसागर यांनी ही मागणी केली. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, पहिल्या दिवशी मी जेव्हा मस्साजोग गावात आलो होतो, तेव्हा मी हीच मागणी केली होती. लोकांच्या मनात रोष आहे. वाल्मीक कराड या गुन्ह्यातील मास्टरमाइंड आहे, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी या प्रकरणाची मागणी सभागृहात केली आहे, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले. 

"वाल्मीक कराड याला ३०२ मध्ये घेतले नाहीतर लोक रस्स्यावर उतरतील. लोकांच्या रोष आहे. लोकांना कोणीही बोलावून घेतलेले नाही, त्यांचे ते येत आहेत. आज टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केले. एखादा कोण टाकीवरुन पाय घसरुन पडला असता तर काय झाले असले. लोकांनी आधी टॉवरवर चढून आंदोलन करणार म्हणून सांगितलं पण ते पाण्याच्या टाकीतवर चढले. हे आंदोलन एका जातीचे नाही, सत्ताधारी पक्षातील नेतेही या प्रकरणावर बोलत आहेत, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले. 

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा: क्षीरसागर

"सगळी लोक त्यांच्याविरोधात बोलत आहेत. तरीही काहीही होत नाही. त्या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड ते असूनही जर त्यांच नाव येत नसेल तर त्यांना कुठेतर संरक्षण त्या मंत्रि‍पदाच भेटत आहे. ते फिल्मी स्टाइलने येतात आणि सरेंडर होतात. याचा अर्थ कुठेतरी संरक्षण आहे, हा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे,अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर