शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:59 IST

Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

Maharashtra Politics ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. यावरुन आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. 

जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

आमदार क्षीरसागर यांनी खंडणीमुळे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाला आहे असा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप श्रीरसागर यांनी केली. 

'एबीपी माझा' या वृत्तावाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आमदार क्षीरसागर यांनी ही मागणी केली. आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, पहिल्या दिवशी मी जेव्हा मस्साजोग गावात आलो होतो, तेव्हा मी हीच मागणी केली होती. लोकांच्या मनात रोष आहे. वाल्मीक कराड या गुन्ह्यातील मास्टरमाइंड आहे, या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी या प्रकरणाची मागणी सभागृहात केली आहे, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले. 

"वाल्मीक कराड याला ३०२ मध्ये घेतले नाहीतर लोक रस्स्यावर उतरतील. लोकांच्या रोष आहे. लोकांना कोणीही बोलावून घेतलेले नाही, त्यांचे ते येत आहेत. आज टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केले. एखादा कोण टाकीवरुन पाय घसरुन पडला असता तर काय झाले असले. लोकांनी आधी टॉवरवर चढून आंदोलन करणार म्हणून सांगितलं पण ते पाण्याच्या टाकीतवर चढले. हे आंदोलन एका जातीचे नाही, सत्ताधारी पक्षातील नेतेही या प्रकरणावर बोलत आहेत, असंही आमदार क्षीरसागर म्हणाले. 

धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा: क्षीरसागर

"सगळी लोक त्यांच्याविरोधात बोलत आहेत. तरीही काहीही होत नाही. त्या सगळ्या प्रकरणाचे मास्टरमाइंड ते असूनही जर त्यांच नाव येत नसेल तर त्यांना कुठेतर संरक्षण त्या मंत्रि‍पदाच भेटत आहे. ते फिल्मी स्टाइलने येतात आणि सरेंडर होतात. याचा अर्थ कुठेतरी संरक्षण आहे, हा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन पदापासून दूर व्हावे,अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर