शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यास उशीर, पाच गावांतील शेतात घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 3:57 PM

नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत

ठळक मुद्देशेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडले

अंबाजोगाई : तालुक्यातील धनेगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही लातूर पाटबंधारे विभागाने चार दिवस धरणाचे दरवाजे उघडले नाहीत. परिणामी क्षमतेपेक्षा धरणाची पाणीपातळी अधिक वाढल्याने बॅक वाॅटर पाच गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे. 

मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मी. एवढी आहे. परतीच्या पावसामुळे पाण्याची आवक चांगली होऊन २७ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणीसाठा २२४ दलघमी झाला, तरीदेखील पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त साठ्याचा विसर्ग करणे आवश्यक होते. मात्र, लातूर पाटबंधारे विभागाने धरण भरून चार दिवस झाले तरी दरवाजे उघडलेच नाहीत. परिणामी पाणीपातळी ७ सेंमीने वाढून ६४२.४४ मी. झाल्याने बॅक वाॅटरचे पाणी सादोळा, भालगाव, सोनेसांगवी, सुर्डी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे शेतीचे आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  या नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार आ. नमिता मुंदडा यांनी रविवारी जलसंपदामंत्र्यांकडे करत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.

कालव्याऐवजी दरवाजांद्वारे सोडले पाणी  दरम्यान, शेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजांमधून सध्या ९.८९६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे दरवाजे बंद करून पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी आ. नमिता मुंदडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होत्या.

 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणBeedबीडFarmerशेतकरी