शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडपर्यंत रेल्वेमार्ग तयार; आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:01 IST

मराठवाड्यासाठी महत्वाचे! धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाची पडताळणी सुरू?

बीड : अहिल्यानगर-बीडपर्यंतरेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाची केंद्र शासनस्तरावरून पडताळणी हाेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदरील रेल्वे कामासाठी ४,८५७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा मार्ग २४० किमी आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालय कधी निर्णय घेईल याकडे लक्ष लागले आहे.

सोलापूर-जळगाव या रेल्वेलाइनसाठी तुळजापूर, उस्मानाबाद, बीड, गेवराई, पैठण, घृणेश्वर, सिल्लोड व अजिंठा या मार्गाचा सर्व्हे केला जाईल, असे २००८-०९ मध्ये जाहीर करण्यात आले होते; परंतु पुढे हे सर्व्हे काम पूर्ण झाले नव्हते. त्यानंतर २०१७ मध्ये मराठवाडा रेल्वे विकास समितीच्या वतीने सदरील सर्व्हे तत्काळ करावा, अशी मागणी केली होती. हा मार्ग बदलण्यात येत असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात तेव्हा करण्यात आला होता. त्यानंतर रेल्वेकडून दोन भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. पहिल्या भागात उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन लाइन प्रोजेक्ट आरईसीटी सर्व्हे २०१८-१९ मध्ये मंजूर करून त्यानुसार २८ जुलै २०२२ रोजी रेल्वे बोर्डाला सर्व्हेक्षण रिपोर्ट पाठिवला होता. तर दुसऱ्या भागात सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर या रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण करण्यात आले होते.

तर बीडचा होणार औद्यागिक विकासबीडमध्ये इंडस्ट्रिअल एरिया नाही म्हणून विकास खुंटलेला आहे. परंतु आता अहिल्यानगर ते बीड या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील तीन महिन्यात रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. हे पूर्ण झाल्यानंतर इतर एक्सप्रेस रेल्वे बीडशी जोडल्या जातील. रेल्वे बीडमध्ये येणार असल्याने मालवाहतुक सोपी होईल. त्यातच आता धाराशीव-बीड-छत्रपती संभाजी नगर रेल्वे मार्गाचा सर्व्हे आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे हा मार्ग झाला तर बीड शहर हे रेल्वेसाठी मध्यवर्ती ठिकाणी होईल. वाहतूक सुविधा निर्माण झाल्यास मोठ्या कंपन्या बीडमध्ये येतील परिणामी बीडचा विकास झपाट्याने होईल असे अपेक्षित आहे.

वाहतुकीवर खुप काही निर्भरट्रक किंवा इतर वाहनांच्या मदतीने इतर जिल्ह्यातील किरणा, लोखंड, स्टील, खते यासह इतर माल बीडमध्ये पोहोचतो. वाहनाद्वारे होणारे वाहतुक खर्चिक असते. परंतु रेल्वेद्वारे माल वाहतूक कमी खर्चिक असते. शिवाय कमी वेळेत देशभरात इतर ठिकाणी माल आणला-नेला जाऊ शकतो. वाहतुकीवर खुप काही निर्भर त्यामुळे वाहतूक दर कमी असल्यास माल ने-आण करण्यास आर्थिक झळ बसत नाही. त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडMarathwadaमराठवाडा