शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे करून मुख्यमंत्री महाजनादेश मागणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:34 IST

भाजप-सेनेच्या सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या मंत्र्यांनी ९० हजार कोटींचे घोटाळे केले आहेत. हा एवढा भ्रष्टाचार समोर असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महाजनादेश मागणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देअमोल कोल्हे । अंबाजोगाईत शिवस्वराज्य यात्रेनिमित्त निघाली मोटारसायकल रॅली

अंबाजोगाई / माजलगाव : भाजप-सेनेच्या सोळा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची २२ प्रकरणे प्रलंबित आहेत. या मंत्र्यांनी ९० हजार कोटींचे घोटाळे केले आहेत. हा एवढा भ्रष्टाचार समोर असतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महाजनादेश मागणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निघालेली शिवस्वराज्य यात्रा शनिवारी सकाळी अंबाजोगाईत पोहचली. अंबाजोगाई शहरातून निघालेल्या भव्य मोटारसायकल रॅलीनंतर मोंढा मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खा. डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, नंदकिशोर मुंदडा, नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.डॉ. कोल्हे म्हणाले की, फडणवीस सरकार पूर्ण पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. या सरकारने सामान्य जनतेच्या अपेक्षांचा कडेलोट केलाय. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात सोळा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. राज्यात मुख्यमंत्र्यांचं गाव नागपूर हे क्राईम कॅपिटल झालंय. गेल्या पाच वर्षात राज्यात एक लाख २५ हजार महिलांवर अत्याचार झाले. १६ हजार ५०० महिलांवर बलात्कार झाले. ३७ हजार महिलाचा विनयभंग झाला. अशी स्थिती असतांना कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. असं कसं म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित केला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजप सरकारने राज्यात किळसवाणे राजकारण सुरू केले आहे. विरोधकांना ईडी, न्यायालय, सीबीआयच्या धमक्या दाखवून पक्षांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. ज्यांनी सत्ता भोगली, पदे भोगली ते आता पक्ष सोडून जात आहेत. परंतु अशा गयाराम लोकांमुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, एअर स्ट्राईकमध्ये लोकसभा घालविली आता पुन्हा ३७० कलमामध्ये विधानसभा घालवू नका. नाही तर आपलं पुन्हा वाटोळं होईल. भाजपा-सेना हा फसव्यांचा पक्ष आहे. केवळ थापा मारून त्यांनी पाच वर्षे घालविली. कर्जमाफीच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. दुष्काळात शेतकऱ्यांना वाºयावर सोडले. अशा या थापाड्या सरकारला सत्तेपासून खाली खेचा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलतांना नमिता मुंदडा म्हणाल्या की, केज विधानसभा मतदारसंघ व मुंदडा परिवार यांचे कौटुंबिक नाते आहे. हे नाते जोपासून मतदारसंघाला न्याय देण्यासाठी मी विमलताईंचा वारसा खंबीरपणे जोपासेल. त्यांचे अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे अधुरे राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. यावेळी बोलतांना अक्षय मुंदडा म्हणाले की, कसलेही पद नसतांना गेल्या सात वर्षांपासून जनतेच्या आशीवार्दामुळे व प्रेमामुळे आम्ही राजकारणात टिकून आहोत. विमलताई मुंदडा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जे स्थान निर्माण केले. त्याचा मोठा फायदा केज मतदारसंघाच्या विकासासाठी झाला. जिल्हा निर्मितीसाठी लागणारी सर्व कार्यालये आज अंबाजोगाईत आहेत. मात्र, केज विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षांपासून विकासापासून वंचित आहे. याच इमारतींना रंग देऊन उद्घाटने करण्याचा खटाटोप सुरू आहे. आमदारांनी दुष्काळासंदर्भात एकही बैठक घेतली नाही. अथवा दुष्काळात होरपळणाºया शेतकºयांसाठी चाराछावण्या सुरू केल्या नाहीत, असे विविध आरोप अक्षय मुंदडा यांनी यावेळी केले.वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करण्यासाठी नमिता मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघात ५ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करून सभेसाठी आलेल्या कार्यकर्ते व शेतकरी यांना ५ हजार वृक्षांचे वाटप केले. शिवस्वराज्य यात्रा अंबाजोगाई शहरात सकाळी १० वाजता दाखल झाली. या मोटारसायकल रॅलीत २ हजारांपेक्षा जास्त मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.माजलगावात स्वागतशिवस्वराज्य यात्रेचे माजलगाव शहरात शुक्र वारी दुपारी ४ वाजता आगमन झाले. परभणी चौफाळा येथून दुचाकी रॅलीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर मोंढा मैदान येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. डॉ.अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, अमोल मिठकरी, माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, अमरसिंह पंडित, अशोक डक, जयसिंह सोळंके, रमेश सोळंके, शेख मंजुर आदी उपस्थित होते.पार्सल परळीला पाठविणारमाजी मंत्री प्रकाश सोळंके म्हणाले की, माजलगाव मतदार संघातील जनतेला गोडबोलून आलेले परळीचे पार्सल जनता वापस पाठवणार आहे. महाराष्ट्रातील एकमेव नॉटरिचेबल आमदार म्हणून आ.आर.टी.देशमुखांनी ख्याती मिळवली. भाजपाकडून आपल्यालाच उमेदवारी म्हणत गावोगावी देशमुख-आडसकर-जगताप हे नाचत फिरत आहेत. आता उपºयांना उमेदवारी मिळणार नसून भाजपाकडून ओमप्रकाश शेटेच उमेदवार असल्याचे प्रकाश सोळंके म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ही भाषण झाले. सूत्रसंचालन कचरु खळगे, आभार प्रदर्शन बाजार समिती सभापती अशोक डक यांनी मानले.

टॅग्स :BeedबीडNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार