शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग आंदोलनात पाचशे शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ...

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० किसान पुत्रांनी या अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण जि. यवतमाळ येथील बालासाहेब करपे आणि मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लेकरांसह सामूहिक आत्महत्या केली. शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या अशी नोंद या आत्महत्येची शासन दरबारी झाली. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या जाचक कायद्यामुळे आजपर्यंतच्या सर्व शेतकरी आत्महत्या होत आहेत, असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे. जोपर्यंत शेतकरी विरोधातील जाचक कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत अशा आत्महत्या सुरुच राहतील, त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी किसानपुत्र आंदोलन गेली पाच वर्षांपासून सातत्याने करीत आहे. याच मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा उपक्रम राबवला जात आहे. अंबाजोगाई शहरात हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविला जात असून यावर्षी या आंदोलनास अंबाजोगाई, दैठणा, नांदेड, पूस, चनई, गडचिरोली, केज, पाटोदा, घाटनांदूर, माजलगाव तसेच अन्य गावांमधून प्रतिसाद मिळाला.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

महाराष्ट्रात आणि देशात आजपर्यंत झालेल्या सर्व शेतकरी आत्महत्या या शेतकरी विरोधी जाचक कायद्यामुळेच झाल्या असून हे जाचक कायदे त्वरित रद्द करा या मागणीचे एक निवेदन येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांना देण्यात आले. यावेळी सुदर्शन रापतवार, कालिदास आपेट, ॲड. संतोष पवार, ॲड. संतोष लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, पुंडलिक बापू पवार, मनोहर कदम, डॉ. ‌ डी. एच. थोरात, जगदीश जाजू, गणेश चौधरी, लखन होके, विनोदकुमार बुरांडे, संजय आपेट, राजेंद्र रापतवार, आप्पाराव पांढरे आदी उपस्थित होते.

===Photopath===

190321\avinash mudegaonkar_img-20210319-wa0059_14.jpg

===Caption===

अंबाजोगाईत १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भाने किसानपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन केले.  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने प्रभावी अंमलबजावणी करण्याची  मागणी करणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांना देण्यात आले.