शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

अन्नत्याग आंदोलनात पाचशे शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद ...

अंबाजोगाई : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनास अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास ५०० किसान पुत्रांनी या अन्नत्याग आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

१९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण जि. यवतमाळ येथील बालासाहेब करपे आणि मालती करपे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लेकरांसह सामूहिक आत्महत्या केली. शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या अशी नोंद या आत्महत्येची शासन दरबारी झाली. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या जाचक कायद्यामुळे आजपर्यंतच्या सर्व शेतकरी आत्महत्या होत आहेत, असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे. जोपर्यंत शेतकरी विरोधातील जाचक कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत अशा आत्महत्या सुरुच राहतील, त्यामुळे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी किसानपुत्र आंदोलन गेली पाच वर्षांपासून सातत्याने करीत आहे. याच मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाचा उपक्रम राबवला जात आहे. अंबाजोगाई शहरात हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविला जात असून यावर्षी या आंदोलनास अंबाजोगाई, दैठणा, नांदेड, पूस, चनई, गडचिरोली, केज, पाटोदा, घाटनांदूर, माजलगाव तसेच अन्य गावांमधून प्रतिसाद मिळाला.

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

महाराष्ट्रात आणि देशात आजपर्यंत झालेल्या सर्व शेतकरी आत्महत्या या शेतकरी विरोधी जाचक कायद्यामुळेच झाल्या असून हे जाचक कायदे त्वरित रद्द करा या मागणीचे एक निवेदन येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांना देण्यात आले. यावेळी सुदर्शन रापतवार, कालिदास आपेट, ॲड. संतोष पवार, ॲड. संतोष लोमटे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, पुंडलिक बापू पवार, मनोहर कदम, डॉ. ‌ डी. एच. थोरात, जगदीश जाजू, गणेश चौधरी, लखन होके, विनोदकुमार बुरांडे, संजय आपेट, राजेंद्र रापतवार, आप्पाराव पांढरे आदी उपस्थित होते.

===Photopath===

190321\avinash mudegaonkar_img-20210319-wa0059_14.jpg

===Caption===

अंबाजोगाईत १९ मार्च रोजी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भाने किसानपुत्रांनी अन्नत्याग आंदोलन केले.  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने प्रभावी अंमलबजावणी करण्याची  मागणी करणारे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर यांना देण्यात आले.