शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंडलिका’च्या डाव्या व उजव्या कालव्यांतून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू; शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:32 IST

धारूर : उपळी कुंडलिका प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. यामुळे पिकाला जीवदान मिळाले ...

धारूर : उपळी कुंडलिका प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून गुरुवारी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. यामुळे पिकाला जीवदान मिळाले आहे. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील संपूर्ण तलाव धरण पाण्याने शंभर टक्के पूर्ण भरलेले आहेत.

सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे पाटबंधारे विभाग तेलगाव यांच्याकडे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली. सध्या रब्बीचे पीक जोमात असून, पाण्यामुळे पिके कोमेजून जाऊ लागली होती. यासाठी पाण्याची आवश्यकता असल्यामुळे आणि शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्यामुळे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी गुळभिले तसेच मोजणीदार डी. डी. सावंत यांनी तत्काळ शेतकरी वर्गाकडून पाणी अर्ज भरून घेऊन पाणीपट्टी भरून घेतली आणि शेती भिजविण्यासाठी पाटाला पाणी सोडण्यात आले. याचा फायदा तलावाखालील गावे, पुसरा, हिवरगव्हाण, उपळी, आदी गावांना होणार आहे. तसेच हे पाणी नवीन ऊस लागवड, तुटून गेलेला ऊस, भुईमूग यांना जीवनदायी ठरणार आहे, असे मोजणीदार डी. डी. सावंत यांनी सांगितले. पाणी सोडण्यासाठी परिसरातील शेतकरी तयब पटेल, बालासाहेब मोरे, अनुरथ मोरे, सचिन हरकाळ, सतीश राऊत, विजय चव्हाण, आदी हजर होते.

उत्पादन वाढण्यास मदत होणार - राहूल राठोड

माझे दोन एकर भुईमूग पिक सध्या बहारात आले होते. मला पाण्याची खूप आवश्यकता होती. पाटाला पाणी आल्यामुळे मी समाधानी झालो आहे, असे शेतकरी राहूल राठोड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी पाण्यासाठी अर्ज करावेत - अभियंता डि बी गुळभिले

शेतकरी वर्गाची मागणी येताच पाणी अर्ज भरून घेऊन सध्या पिकाला पाणी देणे गरजेचे आहे आणि तलाव शंभर टक्के भरल्या मूळे पाणी सोडण्यास अडचण नाही, असे कुंडलिका तलावाचे अभियंता डि बी गुळभिले यांनी सांगितले.

===Photopath===

180321\0639img-20210318-wa0160_14.jpg

===Caption===

कुंडलिकाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाण्याचे उन्हाळी पहिले आवर्तन सुरू