शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: ... अखेर मराठा आंदोलन मागे, हायकोर्टाच्या विनंतीला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 21:08 IST

Maratha Reservation: मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे.

बीड - मराठा मोर्चा आंदोलनाला जिथून सुरुवात झाली, त्या परळीतील मराठा आंदोलकांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. गेल्या 21 दिवसांपासून हे आंदोनल सुरु होते. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. या आंदोलनानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले. तर गंगापूर येथील काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून शपथपत्र सादर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही याबाबतचा अंतिम अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत देऊ, असे न्या. एम. जी. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील मागासवर्ग आयोगाने सांगिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने मागितलेला तीन महिन्यांचा कालावधी जास्त आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने पुकारलेले आंदोलन तीव्र होत असून, त्यात आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. न्यायालयाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाला आपला अहवाल लवकरात लवकर सादर करण्यास सांगावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली. त्यानंतर,

बीड जिल्ह्याच्या परळी येथून सुरु झालेले मराठा आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. 21 दिवसांच्या आंदोलनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची माहिती मराठा आंदोलनातील संयोजकांनी दिली. परळीतील तहसील कार्यालयाजवळ मराठा आंदोलनाला सुरुवात झाली होती. नागपूर अधिवेशनावेळी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. त्यानंतर, राज्यभर आंदोलनाचे पडसाद उमटले. तर अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आंदोलनात आपला जीव दिला. याप्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली, त्यावेळी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन आणि आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती उच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर, आज परळीतून सुरु झालेले हे आंदोलन मागे घेत असल्याचे परळीतील मराठा आंदोलनातील संजोयकांनी जाहीर केले.

मराठा आरक्षणाचा 25 वर्षांचा लढा होता, आज या विजयाचे श्रेय परळी, बीडवासियांना आहे. हे आंदोलन शांततेत चालू होते, काही दुसऱ्यांनीच या आंदोलनात घुसून गोंधळ घातला व आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले.  या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य केली. तसेच  सरकारने मराठा आरक्षण जाहीर करण्याचा टाइम बॉण्ड दिला, आरक्षण जाहीर होईपर्यंत मेगा भरती स्थगित केली, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला भरीव तरतूद करणे यांसह सर्व मागण्या संदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले, असे परळीतील मराठा आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाBeedबीड