शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:34 IST

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात बहुतांश गावांना ...

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात बहुतांश गावांना कोरोनाने ग्रासले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा रुग्ण निष्पन्न करताना आरोग्य यंत्रणेसमोरही मोठ्या अडचणी निर्माण होतात. शहरी भागातील नागरिक ज्याप्रमाणे दक्षता बाळगतात, ती दक्षता ग्रामीण भागात दिसत नाही. परिणामी, कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे.

वृक्ष संवर्धनाची गरज

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात पठाण मांडवा परिसरात असलेल्या वनविभागाच्या जंगलात अचानक आग लागली. या आगीत अनेक वृक्षसंपदा जळून खाक झाल्या. डोंगरावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष होते. यात सीताफळांच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अचानक लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वृक्ष्यांची हानी झाली. आता आगामी काळात या परिसरात वृक्षसंवर्धन करणे हे वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. या कामी सामाजिक संस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वृक्षमित्र हेमंत धानोरकर यांनी केली आहे.

संरक्षक भिंती झाल्या विद्रूप

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था, शाळा यांच्या संरक्षक भिंतीवर विविध क्लासेस, तसेच विविध कंपन्यांच्या वतीने संरक्षक भिंती रंगवून त्यांचा वापर जाहिरातबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अशा प्रकारच्या जाहिराती करण्यास निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. चांगल्या भिंतीचे विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

अंबेजोगाई : गेल्या काही महिन्यांत अंबेजोगाई तालुक्यात व शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक आपले वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, तसेच अनेक युवक शहरातही गर्दीच्या ठिकाणी सुसाट वेगाने वाहन चालवितात. परिणामी, अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शासनाने हेल्मेटचा वापर सक्तीचा करूनही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यास मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. यासाठी हेल्मेटला प्राधान्य द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवि मठपती यांनी केले आहे.

काकडीला मागणी वाढली

अंबेजोगाई : उन्हाळ्यात आहारामध्ये काकडीला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. शरीराला थंडावा मिळत असल्याने, काकडीचा वापर करण्याकडे गृहिणींचा मोठा कल असतो. सध्या बाजारात काकडीची आवकही मोठ्या प्रमाणात असल्याने काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. शहरवासीयांमध्ये काकडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असल्याचे समोर आले आहे.