शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:34 IST

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात बहुतांश गावांना ...

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तालुक्यात बहुतांश गावांना कोरोनाने ग्रासले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा रुग्ण निष्पन्न करताना आरोग्य यंत्रणेसमोरही मोठ्या अडचणी निर्माण होतात. शहरी भागातील नागरिक ज्याप्रमाणे दक्षता बाळगतात, ती दक्षता ग्रामीण भागात दिसत नाही. परिणामी, कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे.

वृक्ष संवर्धनाची गरज

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात पठाण मांडवा परिसरात असलेल्या वनविभागाच्या जंगलात अचानक आग लागली. या आगीत अनेक वृक्षसंपदा जळून खाक झाल्या. डोंगरावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष होते. यात सीताफळांच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अचानक लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वृक्ष्यांची हानी झाली. आता आगामी काळात या परिसरात वृक्षसंवर्धन करणे हे वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. या कामी सामाजिक संस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वृक्षमित्र हेमंत धानोरकर यांनी केली आहे.

संरक्षक भिंती झाल्या विद्रूप

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरात असणाऱ्या विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था, शाळा यांच्या संरक्षक भिंतीवर विविध क्लासेस, तसेच विविध कंपन्यांच्या वतीने संरक्षक भिंती रंगवून त्यांचा वापर जाहिरातबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अशा प्रकारच्या जाहिराती करण्यास निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. चांगल्या भिंतीचे विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा

अंबेजोगाई : गेल्या काही महिन्यांत अंबेजोगाई तालुक्यात व शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक आपले वाहन चालवितांना वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, तसेच अनेक युवक शहरातही गर्दीच्या ठिकाणी सुसाट वेगाने वाहन चालवितात. परिणामी, अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शासनाने हेल्मेटचा वापर सक्तीचा करूनही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यास मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. यासाठी हेल्मेटला प्राधान्य द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवि मठपती यांनी केले आहे.

काकडीला मागणी वाढली

अंबेजोगाई : उन्हाळ्यात आहारामध्ये काकडीला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. शरीराला थंडावा मिळत असल्याने, काकडीचा वापर करण्याकडे गृहिणींचा मोठा कल असतो. सध्या बाजारात काकडीची आवकही मोठ्या प्रमाणात असल्याने काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. शहरवासीयांमध्ये काकडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असल्याचे समोर आले आहे.