शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:02 IST

पाच ठराव मंजूर : कवी संमेलनाने आणली रंगत लोकमत न्यूज नेटवर्क शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य ...

पाच ठराव मंजूर : कवी संमेलनाने आणली रंगत

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. दोन दिवसांच्या या संमेलनामुळे साहित्यप्रेमी रसिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

‘कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण’ या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. सुधीर येवले आणि विषयतज्ज्ञ संध्या कुलकर्णी यांनी विचार मांडले. त्यानंतर ग्रामीण कथाकार भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन कार्यक्रमात संगिता होळकर-औटी यांच्यासह बालकथाकार पूजा सुरसे, ऋतुजा खेडकर, सोफियान पठाण यांनी सहभाग घेतला. दुपारी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमात शाहीर अनिलसिंह तिवारी आणि नकलाकार घोडके यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. तर रेणुका विद्यालय, मानूर, घाटशिळा विद्यालय, घाटशीळ पारगाव, दहिफळे वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेले.

नवोदित आणि अनुभवी कवींनी एकाहून एक कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी माधव सावंत होते. यावेळी लक्ष्मण खेडकर, प्रा. डॉ. अशोक घोळवे, श्रावण गिरी, दीपक महाले, संदीप काळे, प्रा. डॉ. विठ्ठल जाधव, सुरेखा येवले, युवराज वायभासे, श्रीराम गिरी, केशव कुकडे, इम्रान शेख, मनिषा लबडे, जया कुलथे, देविदास शिंदे, अविनाश बुटे, अजिनाथ ठोंबरे, द. ल. वारे, महेश मगर, भाऊसाहेब नेटके, सुनील केकाण, सचिन अभंग, राजेंद्र लाड, संगीता होळकर, मधुकर केदार, राहुल ससाणे, नीलेश दौंड, अण्णासाहेब तहकिक, शहादेव सुरासे, संध्याराणी कोल्हे, नानासाहेब खरात, शहारुख लखाणे, संजय राठोड, सानिका खेडकर, आकांक्षा सोनवणे, अनघा कुलकर्णी, संस्कृती बडे यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन के. बी. शेख यांनी केले.

साहित्य संमेलनातील ठराव

या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत अनिवार्य करावे, शासकीय कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करावी, भाषा संवर्धनासाठी वरिष्ठ स्तरावरून विविध उपक्रमांचे आयोजन करावे, मानूर येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या शिल्पकृतीचे पुरातत्व विभागाने संवर्धन करावे, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिरुर शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना आणि उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाणपोईची उभारणी करावी, असे पाच ठराव मंजूर करण्यात आले.

‘अंतरीचे धावे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवी संमेलन सत्रात प्रसिद्ध कवी श्रावण गिरी यांच्या ‘अंतरीचे धावे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष माधव सावंत, ग्रामीण कथाकार भास्कर बडे, अनंत कराड, गोकुळ पवार उपस्थित होते.