शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

एकता मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:02 IST

पाच ठराव मंजूर : कवी संमेलनाने आणली रंगत लोकमत न्यूज नेटवर्क शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य ...

पाच ठराव मंजूर : कवी संमेलनाने आणली रंगत

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरुरकासार : तालुक्यातील श्री गुरुविरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर येथे तिसऱ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचा समारोप गुरुवारी उत्साहात झाला. दोन दिवसांच्या या संमेलनामुळे साहित्यप्रेमी रसिकांना आणि तालुक्यातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

‘कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण’ या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. सुधीर येवले आणि विषयतज्ज्ञ संध्या कुलकर्णी यांनी विचार मांडले. त्यानंतर ग्रामीण कथाकार भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन कार्यक्रमात संगिता होळकर-औटी यांच्यासह बालकथाकार पूजा सुरसे, ऋतुजा खेडकर, सोफियान पठाण यांनी सहभाग घेतला. दुपारी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमात शाहीर अनिलसिंह तिवारी आणि नकलाकार घोडके यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. तर रेणुका विद्यालय, मानूर, घाटशिळा विद्यालय, घाटशीळ पारगाव, दहिफळे वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून संमेलनाला एका वेगळ्या उंचीवर नेले.

नवोदित आणि अनुभवी कवींनी एकाहून एक कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी माधव सावंत होते. यावेळी लक्ष्मण खेडकर, प्रा. डॉ. अशोक घोळवे, श्रावण गिरी, दीपक महाले, संदीप काळे, प्रा. डॉ. विठ्ठल जाधव, सुरेखा येवले, युवराज वायभासे, श्रीराम गिरी, केशव कुकडे, इम्रान शेख, मनिषा लबडे, जया कुलथे, देविदास शिंदे, अविनाश बुटे, अजिनाथ ठोंबरे, द. ल. वारे, महेश मगर, भाऊसाहेब नेटके, सुनील केकाण, सचिन अभंग, राजेंद्र लाड, संगीता होळकर, मधुकर केदार, राहुल ससाणे, नीलेश दौंड, अण्णासाहेब तहकिक, शहादेव सुरासे, संध्याराणी कोल्हे, नानासाहेब खरात, शहारुख लखाणे, संजय राठोड, सानिका खेडकर, आकांक्षा सोनवणे, अनघा कुलकर्णी, संस्कृती बडे यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन के. बी. शेख यांनी केले.

साहित्य संमेलनातील ठराव

या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेत अनिवार्य करावे, शासकीय कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी मराठी भाषेतच आपली स्वाक्षरी करावी, भाषा संवर्धनासाठी वरिष्ठ स्तरावरून विविध उपक्रमांचे आयोजन करावे, मानूर येथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा असलेल्या शिल्पकृतीचे पुरातत्व विभागाने संवर्धन करावे, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने शिरुर शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना आणि उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाणपोईची उभारणी करावी, असे पाच ठराव मंजूर करण्यात आले.

‘अंतरीचे धावे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवी संमेलन सत्रात प्रसिद्ध कवी श्रावण गिरी यांच्या ‘अंतरीचे धावे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन टिचर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कवी संमेलनाध्यक्ष माधव सावंत, ग्रामीण कथाकार भास्कर बडे, अनंत कराड, गोकुळ पवार उपस्थित होते.