शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको; आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला ...

बीड : सध्या पावसाळ्याचे दिवस असून कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. वातावरणामध्ये दमटपणाही वाढला आहे. यातच लॉकडाऊनचे निर्बंध सैल झाल्याने लहान-मोठी हॉटेल्स सुरू झाली आहेत. त्याचबरोबर रस्त्यांवर हातगाड्यांवर भजी, वडापाव, मिसळ, दाबेली, पोहे आदी अल्पाेपाहाराची दुकाने सुरू आहेत. गरमागरम भजे, पकोडे, वडा, मिसळभाजीचा खमंग सुगंध येताच मनाला आवर घालता येत नाही. मात्र पावसाळ्याच्या दिवसात आजार टाळण्यासाठी जिभेचे लाड कमीच असायला हवेत. त्याचबरोबर अनियंत्रित खाण्यावर मर्यादा घालण्याची गरज आहे. अति तेलकट, शिळे, उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. परिणामी पोटांचे आजार वाढतात. पावसाळी हंगामात पचनक्रिया मंदावते व प्रतिकारशक्ती कमकुवत होते ती वाढविण्यासाठी आवश्यक तोच चांगला व शुद्ध आहार घेण्याची गरज आहे. पावसाळ्यात हे खायला हवे

धान्याच्या विशेषत: साळीच्या लाह्या, दगडी पोहे, मुगाचे वरण मोड आलेली कडधान्ये, भाज्यांचे सूप,

आहारात गुळाचा वापरही महत्वाचा आहे. पचनास हलके व्यवस्थित शिजलेले ताजे गरम पदार्थ असलेला आहार महत्त्वाचा ठरेल.

गरम मसाला, हिंग, सुंठ, मिरी, जिरे, ओवा, लसणाचा वापर आहारात जास्त करण्याची गरज आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

शेतातून थेट बाजारात आलेल्या पालेभाज्यांमध्ये माती, चिखल लागलेला असतो. त्यामुळे कच्च्या पालेभाज्या खाऊ नये. कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नये.

पचनास अवघड असणारे पदार्थ खायचे टाळावे. जंक फूड, फास्टफूड, दही, थंड पदार्थ खाऊ नये.

उघड्यावरील पदार्थ, शिळे अन्न, टाळावे. तळलेल्या पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे.

दूषित अथवा सार्वजनिक ठिकाणचे पाणी पिण्याचे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. जंतुसंसर्ग, ताप, अतिसाराची लागण होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी बाहेरचे अन्नपदार्थ वातावरण संतुलित होईपर्यंत न खाल्लेले चांगले. स्वच्छ पाणी उकळून पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनाला हलक्या असणाऱ्या पदार्थांचे सेवन महत्त्वाचे ठरते.

उघड्यावरचे पदार्थ खाणे धोक्याचे

पावसाळा कालावधीत पचनक्रिया मंद असते. मात्र भूक वाढते. त्यामुळे आहाराच्या बाबतीत संयम राखावा. उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे. असे पदार्थ टायफाईड, डायरियासारख्या विविध आजारांना आमंत्रण देणारे ठरू शकतात. शरीराला पोषक असलेले हलके पदार्थ खाणे उत्तम ठरेल. - डॉ. नीलेश जगदाळे, बीड.