शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अमानवी अत्याचार होत असतानाही वि. दा. सावरकर स्वातंत्र्याच्या ध्येयापासून कणभरही विचलित झाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात व्याख्यान बीड : थोर स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्त वि. दा. सावरकर यांच्यावर परकीय राजवटीद्वारे ...

लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर : वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयात व्याख्यान

बीड : थोर स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्त वि. दा. सावरकर यांच्यावर परकीय राजवटीद्वारे अमानवी अत्याचार केला गेला. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली गेली तरी स्वातंत्र्याच्या ध्येयापासून कणभरही ते विचलित झाले नाहीत. अंदमान तेथे त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा भोगत असतानाही त्यांचा स्वातंत्र्याचा लढा चालू होता. अंदमान येथील कारागृहाच्या अमानवी वागणुकीविरोधात संप करून इंग्रजांना कारागृहाच्या नियमात बदल करण्यास भाग पाडले. राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी वि. दा. सावरकर यांचे विचार आजही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहेत, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी व्यक्त केले.

बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय आणि अटल जनसेवक मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश भाऊ पोकळे तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नामदेव सानप, भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाहक चंद्रकांत मुळे, प्रा. बन्सी हवाळे, डॉ. राजेश भुसारी, संस्था सचिव गणेश पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर म्हणाले की, वि. दा. सावरकर हे जहाल मतवादी होते. सशस्त्र क्रांतीवर त्यांचा विश्वास होता. सावरकर भाषा साहित्याचे गाढे अभ्यासक होते. अंदमानातील कारागृहात कैद्यांना एकत्र करून साक्षरता मोहीम त्यांनी राबविली. भाषेचा प्रचार व प्रसार केला. कारागृहात ग्रंथालय सुरू करण्यास भाग पाडले. जाती व धर्मभेदाला विरोध केला. सावरकरांनी मानवी एकतेचा संदेश दिला. सावरकर यांचे विचार, लेखन आजही प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे, असे डॉ. बाहेगव्हाणकर यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना संस्था अध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले की, वि. दा. सावरकर हे आक्रमक देशभक्त होते. सशस्त्र क्रांतीमुळे परकीय राजवटीला खऱ्या अर्थाने सुरुंग लावण्याचे काम त्यांनी केले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत, प्रवीण पवार, सत्यशील मिसाळ, अशोक रसाळ, राहुल मुळे, विशाल जोशी, प्रा. वैजनाथ शिंदे, प्रा. सुरेश कसबे, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बप्पासाहेब हावळे यांनी केले तर प्रा. विजय दहिवाळ यांनी आभार मानले.

===Photopath===

010321\070701bed_29_01032021_14.jpg

===Caption===

बीड येथे ‘अंदमानातील सावरकर’ या विषयावर उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी रमेश भाऊ पोकळे होते.