शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

पिके अजूनही पाण्यात, काढणी खर्च काढायचा तरी कसा...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:37 PM

सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले.

ठळक मुद्देअतिवृष्टीचा कहर : अंबाजोगाई तालुक्यात ९ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपाच्या नुकसानीचा प्रथम अंदाज

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले. होत्याचं नव्हतं झालं साहेब. माझ्या तीन एकर सोयाबीनमध्ये पाणी शिरले आहे. आता हे सोयाबीन काढायचे म्हणले तर प्रति बॅग एकरी ४ हजार रुपये खर्च येतो. केवळ काढणीसाठी १२ हजार रुपये लागतात. पुन्हा उगवलेले तण नष्ट करण्यासाठीचा खर्च वेगळा. अशा स्थितीत उत्पादन तर काहीच नाही. खर्च कसा काढायचा, अशी व्यथा पूस येथील शेतकरी त्रिंबक ज्ञानोबा कचरे यांनी मांडली. दरम्यान तालुक्यातील पूस शिवारात शेती करणारे प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. कौटुंबिक अडचणींसह मुलीच्या लग्नाबाबत ते चिंतेत होते.अंबाजोगाई तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने पूस येथे जाऊन पाहणी केली. सोयाबीनचा मोठा पेरा असणाºया या परिसरात आभाळच फाटल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीपाणी झाले. अनेकांच्या सोयाबीनमध्ये पाणी घुसले. पिके पाण्यावर तरंगू लागली. काढून ठेवलेली बाजरी व पिवळ्याच्या ढिगाºयाला आता कोंबे फुटली आहेत. पाऊस उघडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उन्हात वाळवायला ठेवले. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने आहे ते ढिगारेही भिजून कुजून जाऊ लागले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही अनेक शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी तसेच होते. सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. आता हे सोयाबीन काढायचे कसे? हा मोठा प्रश्न भेडसावू लागल्याचे नरसिंग जोशी यांनी सांगितले. परिसरातील शेतांमध्ये लावलेला कापूसही भिजला. कापसाच्या आलेल्या बोंडात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ही बोंडे फुगून त्या आतील कापसाच्या वाती झाल्याचे सांगताना महेश गौरशेटे भावनिक झाले.तालुक्यात ३० हजार शेतकºयांनी नुकसान भरपाई संदर्भात अर्ज दाखल केल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी लोकमतला सांगितले. पाऊस पडून तीन दिवस झाल्यानंतर सोमवारी पूस येथील तलाठी गावात पीकपाहणी व पंचनाम्यासाठी हजर झाले होते. तलाठ्यांना गराडा घालून आमची पाहणी करा अशी मागणी करत शेतकºयांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस