शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

दिलासादायक; तीन वर्षांत डेंग्यूचा एकही बळी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:33 IST

राष्ट्रीय डेंग्यू दिन बीड : जिल्ह्यात मागील तीन वर्षांत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे, असे ...

राष्ट्रीय डेंग्यू दिन

बीड : जिल्ह्यात मागील तीन वर्षांत डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी ५०४ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यावरून आरोग्य विभागाला डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असल्याचे दिसत आहे. यावर्षी ‘डेंग्यूला प्रतिबंध करू या, सुरुवात घरापासून करू या’ हे घोषवाक्य घेऊन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे.

१६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रत्येक वर्षी जनजागृती केली जाते. याचा परिणामही जाणवत आहे. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. याचा प्रसार एडिस इजिप्टाय डासाच्या मादीमार्फत होतो. त्याची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. एक डास एकावेळी १५० ते २०० अंडी घालते. त्यामुळे डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. हा रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले जाते, तसेच पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यासह ते तपासणीसाठी घेतले जातात. ज्यांना ताप आहे, अशांचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. रुग्ण निष्पन्न होताच तात्काळ उपचार करून त्या भागात उपाययोजना केल्या जातात. त्यामुळेच मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद नाही. ही बाब दिलासा देणारी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मिर्झा साजीद बेग व सर्व कार्यालय यासाठी परिश्रम घेत आहेत.

येथून होते डासांची उत्पत्ती

सिमेंट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तू, टायर्स, कूलर या ठिकाणांहून डासांची उत्पत्ती होते.

...अशी आहेत लक्षणे

डेंग्यू ताप आजारात २ ते ७ दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायूदुखी, असा त्रास होतो. उलट्या होणे, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक व तोंडातून रक्तस्राव होणे, अशक्तपणा जाणवणे, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी.

कोरोनामुळे तपासण्या घटल्या

मागील वर्षापासून कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे मागील वर्षात केवळ २४९ लोकांची तपासणी केली. यात ३९ जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले होते. २०१९ मध्ये १,०३८ तपासणी केल्या, यात १८८ पॉझिटिव्ह आढळले, तर २०१८ मध्ये १,५७७ लोकांची तपासणी केली असता २७३ जण पॉझिटिव्ह आढळले होते. चालू वर्षात आतापर्यंत ३७ संशयितांची तपासणी केली असून, केवळ १ जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला आहे. या तीनही वर्षात एकही मृत्यू नाही.

....

मागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकाचाही डेंग्यूमुळे मृत्यू नाही, ही बाब दिलासा देणारी आहे, तसेच नवे रुग्ण शोधून त्यांना औषधोपचार करण्यात आले. आम्ही तर उपाययोजना करतोच; परंतु नागरिकांनीही एक दिवस कोरडा पाळून योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे जाणवताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. मिर्झा साजीद बेग, जिल्हा हिवताप अधिकारी, बीड

---