शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

धारूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस चाचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी ...

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चाचर (फेरी) काढण्यात येते. शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी गीते गावून रंगांची उधळण करण्यात येते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करीत परंपरा खंडित होऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात हा सण राजपूत समाजाच्या वतीने आगळावेगळा साजरा केला जातो. या सणासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी गावी येतात. पाच दिवस थांबतात. धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. यात मिश्रा, हजारी, शुक्ला, दुबे, तिवारी, सददीवाल यांचा समावेश असतो. चाचरसाठी पाच पंच नेमले आहेत. पाच दिवस चाचर साजरी केली जाते. चाचरीचा खर्च प्रत्येक दिवशी एका कुटुंबाकडे असतो. ढोलकी, झांजच्या वाद्यावर गाणी गात कटघरपुरा येथील हनुमान मंदिरापासून चाचरीला सुरुवात करण्यात येते. काशीनाथ चौकापासून सोमवार चौकातील बालाजी मंदिरापर्यंत चाचर काढण्यात येते. यावेळी ‘सिया रघुवीर बरसो एैसो, सिया रघुवीर बरसो एैसो’ अशी गीते गायिली जातात. बालाजी मंदिरात सांगता होते. सायंकाळीही चाचर काढण्यात येते. यावेळी रंगांची उधळण केली जात नाही.

धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. सायंकाळी ठंडाई पिण्यासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात येते. या उत्सवात दुबे, तिवारी, मिश्रा, हजारी, सददीवाल कुटुंबियांकडून चाचरीचा खर्च करण्यात येतो. सणातून एकोप्याची जोपासना करण्यासाठी राजपूत समाजातील होळी मोठा सण समजला जातो. यावेळी भेदभाव विसरून लहान-मोठे सर्वजण सहभागी होतात. शहिदांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो.

प्रशासनाला सहकार्य करणार

कोरोना नियमाचे पालन करून यंदा होळी उत्सव साजरा करणार आहोत. धारूर शहरातील पाच दिवसांचा होळी उत्सव कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करताना प्रशासनास सहकार्य करणार आहोत. त्याचबरोबर उत्सव परपंरा कायम ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.

चाचरनंतर जावयाची मिरवणूक

चाचर संपल्यानंतर जावयाला शोधून गाढवावर बसवून कटघरात मिरवणूक काढण्यात येते. रंग लावून नंतर सासऱ्याच्या घरी नेऊन नवे कपडे घालतात. दुपारनंतर ज्यांचा रंग असतो त्यांच्या घरी थंडाईचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांना बोलावले जाते. सामाजिक एकतेचा मोठा संदेश देणारा येथील ऐतिहासिक होळी उत्सव शहराच्या वैभवात भर टाकणारा असल्याने परिस्थितीनुरूप हा उत्सव यंदा नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.