शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

धारूरमध्ये होळीपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस चाचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:31 IST

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी ...

धारूर : शहरात धूलिवंदनापासून पाच दिवस रंगांची उधळण करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. राजपूत समाजाच्या वतीने धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चाचर (फेरी) काढण्यात येते. शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी गीते गावून रंगांची उधळण करण्यात येते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करीत परंपरा खंडित होऊ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात हा सण राजपूत समाजाच्या वतीने आगळावेगळा साजरा केला जातो. या सणासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी गावी येतात. पाच दिवस थांबतात. धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. यात मिश्रा, हजारी, शुक्ला, दुबे, तिवारी, सददीवाल यांचा समावेश असतो. चाचरसाठी पाच पंच नेमले आहेत. पाच दिवस चाचर साजरी केली जाते. चाचरीचा खर्च प्रत्येक दिवशी एका कुटुंबाकडे असतो. ढोलकी, झांजच्या वाद्यावर गाणी गात कटघरपुरा येथील हनुमान मंदिरापासून चाचरीला सुरुवात करण्यात येते. काशीनाथ चौकापासून सोमवार चौकातील बालाजी मंदिरापर्यंत चाचर काढण्यात येते. यावेळी ‘सिया रघुवीर बरसो एैसो, सिया रघुवीर बरसो एैसो’ अशी गीते गायिली जातात. बालाजी मंदिरात सांगता होते. सायंकाळीही चाचर काढण्यात येते. यावेळी रंगांची उधळण केली जात नाही.

धूलिवंदनाच्या दिवशी चाचर काढण्यात येते. सायंकाळी ठंडाई पिण्यासाठी अनेकांना निमंत्रण देण्यात येते. या उत्सवात दुबे, तिवारी, मिश्रा, हजारी, सददीवाल कुटुंबियांकडून चाचरीचा खर्च करण्यात येतो. सणातून एकोप्याची जोपासना करण्यासाठी राजपूत समाजातील होळी मोठा सण समजला जातो. यावेळी भेदभाव विसरून लहान-मोठे सर्वजण सहभागी होतात. शहिदांच्या स्मृतीला उजाळा दिला जातो.

प्रशासनाला सहकार्य करणार

कोरोना नियमाचे पालन करून यंदा होळी उत्सव साजरा करणार आहोत. धारूर शहरातील पाच दिवसांचा होळी उत्सव कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करताना प्रशासनास सहकार्य करणार आहोत. त्याचबरोबर उत्सव परपंरा कायम ठेवणार असल्याचे नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.

चाचरनंतर जावयाची मिरवणूक

चाचर संपल्यानंतर जावयाला शोधून गाढवावर बसवून कटघरात मिरवणूक काढण्यात येते. रंग लावून नंतर सासऱ्याच्या घरी नेऊन नवे कपडे घालतात. दुपारनंतर ज्यांचा रंग असतो त्यांच्या घरी थंडाईचा कार्यक्रम असतो, या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांना बोलावले जाते. सामाजिक एकतेचा मोठा संदेश देणारा येथील ऐतिहासिक होळी उत्सव शहराच्या वैभवात भर टाकणारा असल्याने परिस्थितीनुरूप हा उत्सव यंदा नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे.