शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

दुचाकी चोर सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:04 IST

माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल ...

माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चोरांचा शोध लावण्याची मागणी होत आहे.

तूर बहरल्याने समाधान

अंबाजोगाई : काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. दरम्यान, खरिपातील तूर बहरल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात यावर्षी तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे तुरीचे पीक जोमात आले. सध्या तुरीचे पीक फुलोरा व कळ्यांच्या अवस्थेत आहे. यंदा दमदार पाऊस झाल्याने तुरीला मोठा फायदा झाला.

टपऱ्यांमध्ये पेट्रोल

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकानांमध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. तालुक्याच्या ठिकाणांहून अथवा जवळ असलेल्या पेट्रोलपंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणले जाते व या पेट्रोलमध्ये भेसळ करून ते चढ्या भावाने विकले जाते.

रस्त्याची दुरवस्था

केज : तालुक्यातील शिरूरघाट ते केज या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रस्ता दुरूस्तीसंदर्भात मागणी करूनही दुर्लक्ष आहे.

ग्रामीण ग्राहक वैतागले

माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागात काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करूनही संबंधितांनी दखल घेतलेली नाही. बीएसएनएलची लाईन बिघडल्याने इतर कंपन्यांच्या टॉवरची रेंज मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महत्त्वपूर्ण कामे खोळंबत असल्याने ग्राहक वैतागलेले दिसून येत आहेत.

अवैध धंदे वाढले

बर्दापूर : गावापासून जवळच असलेल्या बर्दापूर फाट्यावर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरित्या दारूची विक्री होते. पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्याची मागणी आहे.

वाहतुकीला अडथळा

पाटोदा : शहरातील विविध बँकांसह सार्वजनिक ठिकाणी दुचाकींची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाहनकोंडी होत आहे. काहीवेळा वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे कारवाया करण्याची मागणी होत आहे.