शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

Beed Railway: २२ वर्षांत केवळ ६६ किलोमीटरचे काम; ३५४ कोटींचा रेल्वे प्रकल्प पोहोचला ४ हजार ८०० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 12:47 IST

१९५ किलोमीटरचे काम कधी होणार? या उत्तरासाठी पुन्हा एकदा बीड जिल्हावासियांना चळवळ उभारावी लागणार आहे.

- अनिल भंडारीबीड : अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचे जिल्हावासियांचे स्वप्न शुक्रवारी पूर्ण होत असलेतरी ते नवीन आष्टी ते अहमदनगर या ६६ किलोमीटर अंतरापर्यंतच मर्यादीत आहे. १९९५ मध्ये ३५४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झाला होता, तो ४ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवारपासून ही रेल्वे निश्चित केलेल्या मार्गावर धावणार असली तरी नगर ते परळी रेल्वेमार्गाचे उर्वरित १९५ किलोमीटर मार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जनआंदोलनाची चळवळ जिवंत ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीतील सर्वच क्षेत्रांतील शिलेदारांवर आहे.

 रेल्वेची सुविधा नसल्याने बीड जिल्हा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास राहिला. निवडणूक आली की रेल्वेचे गाजर दाखवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले. १९८० मध्ये स्व. केशरकाकू क्षीरसागर या खासदार झाल्या. बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासासाठी नगर-बीड-परळी हा रेल्वे मार्ग होणे गरजेचे असल्याची बाब पटवून देत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यानंतर नगर-आष्टी-जामखेड-पाटोदा-केज अंबाजोगाई-परळी अशा मार्गाचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, यात बीडचा नामोल्लेख नसल्याने स्व. काकू यांनी अहमदनगर-बीड-परळी हा प्रस्ताव दाखल केला. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना खा. केशरकाकूंचाचा पाठपुरावा राहिला. परंतु सर्वेक्षणानंतर दिल्लीत बसलेल्या अधिकाऱ्यांनी विविध कारणे देत हा प्रकल्प परवडणारा नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतर काकू यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री जाफर शरिफ यांची भेट घेऊन या मार्गाची गरज पटवून दिली. तर तत्कालीन रेल्वेमंत्री गनीखान चौधरी यांच्या निवासस्थानासमोर काकूंनी उपोषण केल्याची आठवण आंदोलनातील अनेकजण आजही सांगतात. त्यानंतर राजकीय मैदानावर श्रेयाची लढाई सुरू होती. १९९५ मध्ये या मार्गाला मंजुरी मिळून तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे व तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीत रेल्वे मार्गाचे भूमिपूजन बीडमध्ये झाले. त्यानंतर रजनी पाटील खासदार झाल्या. पुन्हा एकदा तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या उपस्थितीत रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले. परंतु, या काळात या मार्गासाठी झालेली तरतूद प्रकल्पाच्या किमतीच्या तुलनेत तोकडी होती. असाच निधी मिळत राहिला तर किमान ३०० वर्षे हा मार्ग पूर्ण करण्यास लागेल, असे विश्लेषण अनेकांनी केले होते. रेल्वेसाठी त्या त्या वेळच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाचे ३६ हेक्टरचे भूसंपादन अद्याप बाकी आहे. ते लवकर पूर्ण व्हावे तसेच पुढील रेल्वेमार्गाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी सामाजिक, राजकीय पातळीवर वेळोवेळी पाठपुरवा करण्याची गरज आहे. 

स्वातंत्र्यसैनिकांचा पुढाकारबीडच्या रेल्वेसाठी जनआंदोलनातून उठाव होत राहिला. बीड जिल्हा स्वातंत्र्यसैनिक रेल्वे आंदोलन समितीच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांचा आधीपासून सनदशीर लढा सुरू होताच त्याचबरोबर तरुणाईसह जिल्ह्यातील जनता रस्त्यावर अनेकदा उतरली. अनेक आंदोलकांनी पोलिसांच्या काठ्या खाल्ल्या, जेलमध्ये जावे लागले. परंतु आंदोलनाची धग पेटत राहिली.

कालबद्धता नसल्याने रेल्वे प्रकल्पाला उशीरलालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वे प्रकल्पांसाठी राज्याने ५० टक्के भार उचलावा असे सुचिवले होते. त्यानुसार या रेल्वेमार्गासाठी राज्याने ५० व केंद्राने ५० टक्के भार उचलण्यासाठी निर्णय झाला. राज्य व केंद्राकडून निधीची तरतूद दरवर्षी होत असलीतरी प्रकल्पाची कालबद्धता ठरविलेली नसल्याने रेल्वे मार्गाचे काम संथगतीने होत राहिले आहे.

नगर - बीड- परळी मार्गावर आतापर्यंत २८०० कोटींचा खर्चगोड मानून घ्या सुरुवातीला अहमदनगर- बीड- परळी हा २५४ किलोमीटरचा मार्ग ३५४ कोटींचा होता. नंतर तो २६७ किलोमीटरचा झाला. २०१२ पर्यंत २८०० कोटीपर्यंत या प्रकल्पाची किंमत पोहचली. हा निधी डिसेंबर अखेरपर्यंत राज्याकडून १४०० व केंद्राकडून १४०० कोटी याप्रमाणे खर्च झाला आहे. २२ वर्षात केवळ ६६ किलोमीटरपर्यंतचे रेल्वेमार्गाचे काम होऊ शकले. या रेल्वे मार्गासाठी पुरेशा निधीची तरतूद होऊ शकली नाही, तसेच निधी उपलब्धतेनंतर काम संथगतीने झाले. यामुळे या प्रकल्पाची किंमत ४ हजार ८०० कोटींवर पोहचली आहे. वेळीच गतीने हा मार्ग झाला असता तर प्रकल्पावरचा खर्च कमी झाला असता आणि रेल्वे धावण्याचे जिल्हावासीयांचे स्वप्न साकार झाले असते. सध्या तरी ६६ किलोमीटर का होईना, गोड मानून घ्या, एवढेच समाधान मानावे लागत आहे.

२६१ किलोमीटर - अहमदनगर- बीड- परळी नवीन ब्रॉडगेज लाइन रेल्वेमार्ग

६६ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम आतापर्यंत झाले

१९५ किलोमीटर - अहमदनगर- आष्टी रेल्वेमार्गाचे काम होणे बाकी

३५४ कोटी -- मंजूर झाले त्यावेळची प्रकल्पाची किंमत

४८०५ कोटी- नवीन ब्रॉडगेज लाइन प्रकल्पाची अंदाजे किंमत

५० टक्के वाटा- भारत सरकार

५० टक्के वाटा- राज्य सरकार

१७ मोठे पूल- या रेल्वेमार्गावर

६३ लहान पूल- या रेल्वे मार्गावर आहेत.

३४ रस्ते- पुलाखालील आहेत.

१२ रस्ते - पुलावरील आहेत

आजपासून डेमू रेल्वे सेवानवीन आष्टी - अहमदनगर नवीन लाइनचे उद्घाटन आणि नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेचा शुभारंभ शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. हिरवा झेंडा दाखवून नवीन आष्टी - अहमदनगर डेमू सेवेचा शुभारंभ होणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह येथे ही डेमू रेल थांबणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीड