शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टाळण्यासाठी काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:41 IST

पोलीस प्रशासनाकडून कलम १४४ लागू : आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघावे बीड : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध ...

पोलीस प्रशासनाकडून कलम १४४ लागू : आवश्यकता असेल तरच घराबाहेर निघावे

बीड : राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध व नियंत्रण ठेवणे करिता राज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा यासंदर्भात शासनाचे इतर अधिनियम लागू करण्यात आलेले आहेत. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, दैनंदिन कामकाज करताना देखील मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत तसेच सॅनिटायझर वापरावे या प्रमुख उपाययोजना आपण काटेकोरपणे पाळल्या तर, आपणास सर्वांना पुन्हा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कलम १४४ बीड जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये तसेच या कलमाचे उल्लंघन होईल, अशी कोणतीही कृती करू नये, सार्वजनिक ठिकाणी नाक व तोंडावर मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई व दंड करण्यात येत आहे. सर्व धार्मीक, सार्वजनिक मिरवणुका, कार्यक्रम, आंदोलन, मोठ्या यात्रा यांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

आवश्यक असेल तरच, ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडावे, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर गर्दी करू नये, दुकानदार, खासगी प्रवासी वाहनधारकांनी मास्क न वापरणाऱ्यांना सेवा देऊ नये, तसेच विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे बीड पोलिसांकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन देखील पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

गर्दीचा नियम सर्वसामान्यांनाच?

गर्दी टाळण्याचा किंवा केल्यास सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा कचाटा दाखवला जातो. मात्र, राजकीय नेत्यांच्या सभा-समारंभासाठी तसेच बैठकांसाठी गर्दीचा नियम लागू नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे गर्दी केली जात आहे. याकडे देखील जिल्हा व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी नियम सर्वांना सारखेच आहेत अशी भूमिका प्रशानाने घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.