शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

माजलगाव : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक आहे. या वर्षी माजलगाव ...

माजलगाव : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक आहे. या वर्षी माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला,फळे प्रचंड प्रमाणात लागवड केलेली असुन लाखो रुपये खर्च करुन भाजीपाला व फळे पिकवले आहेत. परंतु माजलगाव बाजार समिती केवळ कडधान्ये खरेदी करत असुन त्यांनी फळे व भाजीपाला खरेदी करावा, अशी मागणी ॲड नारायण गोले यांनी केली आहे.

येथील बाजार समिती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तूर, बाजरी,गहु ,ज्वारी, हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरित पिकांना खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मेथी, चुका, पालक, गोबी, वांगे, कांदे, लसून, कोथींबीर, भेंडी, गवार, कारले, दोडके व टरबूज पपई, मोसंबी, लिंबू, खरबूज आदि फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीत भाजीपाला व फळे खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून तो आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यातुन अनेक शेतकऱ्यानी भाजीपाला - फळबागा या शहरात नेऊन खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करने तोट्याचे अडचणीचे होत असल्याने व सध्या वारंवार होणाऱ्या लॉकडाऊन मुळे आवश्यक वाहतुक उपलब्ध नसल्यामुळे भाजीपाला व फळे बागेतच पडून राहिले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील निघत नसल्याने अनेक खाजगी सावकारांचे उतरवठे झिजवत आहेत. तर काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत . परंतु शासनाचे प्रतिनिधी असनारे पालकमंत्री, आमदार, खासदार व बाजार समितीतील पदाधीकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवत आहेत .

माजलगाव बाजार समितीने शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ निर्माण करुन तात्काळ खरेदी व विक्री करुन शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या भाजीपाला व फळांची जबाबदारीने व हमीभावात तात्काळ खरेदी सुरु करावी. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतिने ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जंयती दिवशी सकाळी ११ वाजता बाजार समितीचे आवारात भाजीपाला व फळे यांचे बाजार समितीस तोरण बांधुन राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती करुन आसुड आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील, लहु सोळंके, राजाभाउ घायतिडक, मुंजा पांचाळ, समाधान पोळ, सिद्धेश्वर गायकवाड, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, राजेभाऊ जाधव, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, यांच्यासह आदींनी केले आहे.