शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST

माजलगाव : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक आहे. या वर्षी माजलगाव ...

माजलगाव : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक आहे. या वर्षी माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला,फळे प्रचंड प्रमाणात लागवड केलेली असुन लाखो रुपये खर्च करुन भाजीपाला व फळे पिकवले आहेत. परंतु माजलगाव बाजार समिती केवळ कडधान्ये खरेदी करत असुन त्यांनी फळे व भाजीपाला खरेदी करावा, अशी मागणी ॲड नारायण गोले यांनी केली आहे.

येथील बाजार समिती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तूर, बाजरी,गहु ,ज्वारी, हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरित पिकांना खरेदी करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मेथी, चुका, पालक, गोबी, वांगे, कांदे, लसून, कोथींबीर, भेंडी, गवार, कारले, दोडके व टरबूज पपई, मोसंबी, लिंबू, खरबूज आदि फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीत भाजीपाला व फळे खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून तो आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यातुन अनेक शेतकऱ्यानी भाजीपाला - फळबागा या शहरात नेऊन खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करने तोट्याचे अडचणीचे होत असल्याने व सध्या वारंवार होणाऱ्या लॉकडाऊन मुळे आवश्यक वाहतुक उपलब्ध नसल्यामुळे भाजीपाला व फळे बागेतच पडून राहिले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील निघत नसल्याने अनेक खाजगी सावकारांचे उतरवठे झिजवत आहेत. तर काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत . परंतु शासनाचे प्रतिनिधी असनारे पालकमंत्री, आमदार, खासदार व बाजार समितीतील पदाधीकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवत आहेत .

माजलगाव बाजार समितीने शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ निर्माण करुन तात्काळ खरेदी व विक्री करुन शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या भाजीपाला व फळांची जबाबदारीने व हमीभावात तात्काळ खरेदी सुरु करावी. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतिने ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जंयती दिवशी सकाळी ११ वाजता बाजार समितीचे आवारात भाजीपाला व फळे यांचे बाजार समितीस तोरण बांधुन राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती करुन आसुड आंदोलन करण्यात येईल, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील, लहु सोळंके, राजाभाउ घायतिडक, मुंजा पांचाळ, समाधान पोळ, सिद्धेश्वर गायकवाड, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, राजेभाऊ जाधव, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, यांच्यासह आदींनी केले आहे.