शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार: सदाभाऊ खोत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 1:35 PM

राज्य सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही.

- सखाराम शिंदेगेवराई : अडीच वर्षानंतर आज मुख्यमंत्री मास्क काढून आपला चंद्रासारखा मुखडा दाखवणार आहेत. मात्र, त्यांना लोककल्याणकारी राज्य निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याची टीका माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी केली. शिल्लक उसामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

तालुक्यातील हिंगणगाव येथील ३२ वर्षीय शेतकरी नामदेव जाधव याने कारखाना गाळपास ऊस नेत नसल्याने नैराश्यातून तीन दिवसांपूर्वी एक एकर उसाला आग लावून आत्महत्या केली होती.  माजी मंत्री व शेतकरी नेते आ. सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. पुढे बोलताना खोत म्हणाले, हे सरकार अकार्यक्षम असून शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. त्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे राहिले नाही. साखर कारखानदार आता मक्तेदार असल्यासारखे वागू लागले आहेत. मराठवाड्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, याकडे गार्भियाने पाहिले नाही. त्यामुळेच हिंगणगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही खोत यांनी यावेळी केली. 

यावेळी आ.लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, बाळासाहेब मस्के, राजेंद्र राक्षसभुवनकर, श्रीनिवास भोसले, अशोक भोसले, प्रकाश सुरवसे, दादासाहेब गिरी, राजु आष्टेकर, रामदास पवार, प्रा.शाम कुंड, सचिन मोटे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या