शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सांडवा पूर्ववत झाल्यानंतर आरणवाडी तलाव ओसंडून वाहू लागला; पाच गावांमध्ये आंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 12:31 IST

रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता.

धारूर ( बीड ) : मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलाव ओसंडून वाहू लागला आहे. काही दिवसांपूर्वी साठवण तलावाचा सांडवा फोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. जन रेट्यामुळे सांडवा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. यानंतर झालेल्या पावसामुळे तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. मंगळवारी रात्री सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचे दृष्य पाहून पाच गावच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे आरणवाडी तलावाचा सांडवा फोडण्यात आला होता. या प्रकारानंतर तलावाखालील आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी या गावातील ग्रामस्थांनी जन आंदोलन उभारले. ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेऊन दहाच दिवसात सांडवा पूर्ववत बांधण्यात आला. दरम्यान, मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे आरणवाडी साठवण तलावात पाण्याची मोठ्याप्रमाणात आवक झाली. यामुळे मंगळवारी रात्री तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हे दृष्य पाहून पाचही गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जोरदार पावसामुळे रात्री चोरंबा-चारदरी रस्त्यावरील पुलावरून तब्बल सात फूट पाणी वाहत होते. 

पाच गावात हरीत क्रांती होणार या तलावामुळे अनेक वर्षाचे स्वप्न डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे पूर्ण झाले आहे. सांडवा फोडल्याने स्वप्न उधळली होती. जनरेट्यामुळे अधिकारशाही झुकली व सांडवा पूर्ववत झाला. यानंतर आता तलाव पूर्ण भरल्याने डोंगरात हरीतक्रांती करण्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. 

काय होते प्रकरण ?आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूर्ण झाले. तलाव पूर्ण भरल्याने आरणवाडी, चोंराबा, पहाडी पारगाव, थेटेगव्हान, ढगेवाडी येथील ग्रामस्थ समाधानी होते. माञ, रस्तेविकास महामंडळ व पाटबंधारे विभाग यांच्यातील बेबनावामुळे अनर्थ झाला आणि तलावाचा सांडवा फोडण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्याला पाण्यापासून धोका होऊ नये म्हणूण पाणी विसर्ग करण्याचे पञ देताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. साठवण तलाव जुना असल्याने तलावाच्या दगडी भिंतीतून पाणी झिरपण्याची भिती व्यक्त करत खालील गावांच्या सुरक्षितेच्या नावाखाली सांडवा फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याला तलावा खालील पाचही गावातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. विरोधाला न जुमानता सांडावा फोडत लाखो लिटर पाणी सोडून देण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी पेटून उठून सांडावा पूर्ववत करावा, राज्य रस्तेविकास महामंडळ आणि पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करत आंदोलन उभारले होते. दरम्यान, वाढत्या जनरेट्यामुळे १० दिवसातच सांडवा पूर्ववत करण्यात आला. 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसWaterपाणी