शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याला सामोरे जाण्यास तयार आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 18:12 IST

पावसाळ्याला सामोरे जाण्यास तयार आहात? येत्या दोन ते तीन आठवड्यात मान्सून महाराष्टÑात धडक मारणार अशी चिन्हं दिसत आहेत. वातावरणात बदल होत असताना तुम्ही त्यानुसार स्वत:ला तयार करणं आवश्यक असतं. तुम्ही पावसाळ्याला सामोरं जाण्यास तयार आहात का, मान्सूनपूर्व तुम्ही काय काळजी घ्याल हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या मोसमात तुमच्या त्वचेची, केसांची, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कावीळ, खोकला, हगवण, विषमज्वर अशा रोगांनी आजारी पडण्याचे प्रमाण या काळात वाढते. म्हणून तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल.

येत्या दोन ते तीन आठवड्यात मान्सून महाराष्टÑात धडक मारणार अशी चिन्हं दिसत आहेत. वातावरणात बदल होत असताना तुम्ही त्यानुसार स्वत:ला तयार करणं आवश्यक असतं. तुम्ही पावसाळ्याला सामोरं जाण्यास तयार आहात का, मान्सूनपूर्व तुम्ही काय काळजी घ्याल हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या मोसमात तुमच्या त्वचेची, केसांची, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कावीळ, खोकला, हगवण, विषमज्वर अशा रोगांनी आजारी पडण्याचे प्रमाण या काळात वाढते. म्हणून तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल.
फिल्मस्टार काय करतात?
आरोग्याच्याबाबतीत पावसाळा इतका धोकादायक ऋतू असतानाही चित्रपटात मात्र नायक-नायिका अगदी बिनधास्त कसे भिजत असतात, असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. परंतु ते सर्वसामान्यांसारखे कुठल्याही काळजीशिवाय पावसाला सामोरे जात नाहीत. एक तर ज्या पावसात ते भिजतात तो पाऊस बहुतेकदा कृत्रिमच असतो. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे शॉट ओके झाला की लगेच ते पाण्याबाहेर येऊन केस कोरडे करतात. त्यांना भिजण्याचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून हेल्थ एक्सपर्टची टीम त्यांच्या सोबतीला असते. 
अशी घ्या काळजी...
पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून तुमचा आहार योग्य असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही भरपूर पाणी पिणं ही तितकेच गरजेचे आहे. उष्णतेमुळे आलेल्या घामोळ्या, इसब असे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तुमचे केस चांगले असणे आवश्यक आहे. तुमचे केस अधिक काळ ओलसर राहिले तर त्याचा त्रास होतो. ओल्या केसांमुळे दुर्गंधी येते. 
त्वचेकडे द्या विशेष लक्ष
पावसाळ्यात धुलीकण तुमच्या शरीरावर बसण्याची शक्यता असते. यामुळे तुमची असणारी साधारण त्वचा आणि त्याची स्थिती यावर परिणाम होतो. यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचा, शरीर स्वच्छ करणारा साबण वापरा. त्याशिवाय त्वचा चांगल्या पद्धतीने घासून घ्या. अल्कोहोल फ्री टोनरचा वापर करा. शरीरातील बंद झालेली छिद्रे खुली करण्यासाठी याचा फायदा होतो. हवामानात बदल होत असल्याने सनस्क्रीन वापरणे बंद करा. पावसाळ्यात मेकअपचा उपयोग होत नाही. त्यामुळे आतापासूनच मेकअप विषयी आपण सावध राहिले पाहिजे. ब्लिचिंग, फेशियल या काळात टाळणे आवश्यक आहे. रात्री ओठ धुतले पाहिजेत. त्याशिवाय पावसाळ्यात डार्क शेडच्या लिपस्टिक उपयोगी नसतात. 
केस सतत भिजायला नकोत
आपण पावसाळ्यात केस भिजू नये म्हणून काळजी घेत असतो. मात्र अचानक आलेल्या पावसानंतर आपले केस भिजतात. त्यामुळे आपल्याकडे माईल्ड शाम्पू असणे आवश्यक आहे. ज्यायोगे तुम्ही केस धुवू शकता. कंडिशनरचा वापर करणेही चांगले आहे. रात्रीच्यावेळी गरम तेलाने डोक्याला मसाज करा, त्यानंतर केस विंचरणे आवश्यक आहे. डोक्यात कोंडा होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. केसांना रंग देण्याची कल्पना चांगली नाही. या काळात केस नैसर्गिकरित्या राहू द्यावेत. हेअर ड्रायरचा वापर करण्याची गरज असल्याने तोही आपल्याकडे असावा. केस पुसण्यासाठी कोरड्या टॉवेलचा वापर करावा. 
<आहाराच्याबाबतीत सतर्क राहा
पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून आधीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपला आहार योग्य असणे गरजेचे आहे. अन्यथा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. आपल्या शरीरातील पाणी कमी होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व फळे, भाजीपाला विशेषत: हिरव्या पालेभाज्या, कोबी हे धुवून घेतले पाहिजे. भाज्यांमध्ये अळ्या, किडे यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. न शिजविलेली फळे, सलाद टाळावेत. अस्थमा, दमा किंवा मधुमेह असणाºयांनी पावसाळ्यापूर्वी अधिक काळजी घ्यावी. जेणेकरुन पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. पावसाळ्यात अनवाणी चालू नये किंवा ओले बूट घालू नयेत. 
विशेषत: डायबेटिस असणाºया रुग्णांनी याची पूर्वीच काळजी घ्यावी. सहसा दिवसा झोपू नये, त्याशिवाय अतिव्यायाम हा टाळावा.