शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

केजरीवाल सरकारविरोधात TATA MOTORS न्यायालयात; फाईव्हस्टार नेक्सॉन ठरली कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 2:51 PM

Tata Nexon EV बाबत दिल्ली सरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देदिल्ली सरकारविरोधात टाटा मोटर्स दिल्ली उच्च न्यायालयातTata Nexon EV चे अनुदान थांबवलेNexon EV ही FAME मानदंड पूर्ण करणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा

नवी दिल्ली : Tata Nexon EV बाबत दिल्लीसरकारकडून घेतलेल्या एका निर्णयाविरोधात TATA Motors ने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली सरकारने नेक्सॉन ईव्हीला दिले जाणारे अनुदान तात्पुरते थांबवले आहे. याविरोधात टाटा मोटर्सने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (tata motors filed an appeal in delhi high court against decision of govt to temporarily suspend subsidy on tata nexon ev)

०१ मार्च २०२१ रोजी ग्राहकांनी केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली सरकारने टाटा मोटर्सच्या बहुचर्चित आणि इलेक्ट्रिक मोटार सेगमेंटमध्ये आघाडीवर असललेल्या टाटा नेक्सॉन ईव्हीवरील अनुदान तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टाटा मोटर्सकडून दिल्ली उच्च न्यायलायात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दिल्ली परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे केवळ एका नाराज आणि असंतुष्ट ग्राहकाने केलेल्या तक्रारीवरून सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला आहे, असे टाटा मोटर्सचे म्हणणे आहे. 

कोरोना लसीकरण नोंदणी करताना 'या' ५ चुका अजिबात करू नका; नुकसान टाळा

दिल्ली परिवहन विभागाकडून अशा प्रकारचा आदेश मिळणे दुर्दैवी आहे. ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहू, असे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रकरणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. Nexon EV ही FAME मानदंड पूर्ण करणारी एकमेव इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांकडून करण्यात आला. 

दरम्यान, ०१ मार्च २०२१ रोजी दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी ट्विट करत परिवहन विभागाने काढलेल्या आदेशाची माहिती दिली. अनेक ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींनंतर एका इलेक्ट्रिक कारच्या मॉडेलवरील अनुदान थांबवण्यात येत आहे. या प्रकरणी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीचा अंतिम रिपोर्ट येणे बाकी आहे. इलेक्ट्रिक कारना पाठिंबा, प्रोत्साहन दिले जात असले, तरी कोणत्याही वाहन निर्मात्याने केलेल्या दाव्यावर ग्राहकाला विश्वास नसेल, तर त्यांना पाठिशी घालता येणार नाही, असे मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते.

 

टॅग्स :Tataटाटाdelhiदिल्लीGovernmentसरकारRto officeआरटीओ ऑफीसAutomobileवाहन