शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

दुचाकीवरील प्रवाशांची संख्या दोनपेक्षा जास्त नकोच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 12:00 PM

दुचाकीवर दोनापेक्षा जास्त प्रवासी न नेल्यास दंड केला जात असावा, अशीच सध्याची स्थिती आहे की काय, असा प्रश्न पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार कायद्याचे उल्लंघन करीत स्वतःच्या सुरक्षिततेलाच धोक्यात टाकीत आहेत.

ठळक मुद्देस्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतोमोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहेइतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे

भारतात स्कूटर व मोटारसायकल या दुचाकींचा वापर अनेकदा अगदी ट्रकसारखा मालवाहू म्हणून केला जातो. केवळ मालवाहू म्हणूनच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला बालबच्चांसह नेणे यात अनेकांना मोठी धन्यता वाटते. सर्वात मोठा स्टंट भर रस्त्यावर होत असूनही कोणी काही बोलत नाही वा कोणी त्यांना असे करू नका म्हणून सांगत नाही. ना पोलीस ना शेजारी-पाजारी, ना मित्र. अशा प्रकारचे बेकायदा वर्तन करणे यात अनेकांना बेकायदा वाटत नाही.

स्कूटर म्हणजे रिक्षा वा टॅक्सीच्या ऐवजी वापरण्याचे सार्वजनिक साधन आहे का, असाच प्रश्न पडतो. वाढत्या महागाईमुळे, पेट्रोलच्या किंमती वाढण्याने असे जर कोणी कृत्य करीत असेल तर त्याला काय म्हणावे. इतका भारत देश गरीब आहे का, की स्कूटर वा मोटारसायकल घेणे परवडते, ती नेहमी वापरणे परवडते पण कुटुंबाच्या, आपल्याच मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी कोणतीही काळजी न घेता दुचाकीवर एकापेक्षा अनेकांना वाहून नेण्याची कसरत न करणे मात्र परवडत नाही. खरे म्हणजे कायद्यानुसार यावर बंदी आहे. हेल्मेट न वापरण्यावर जशी बंदी व दंड आहे तसेच स्कूटर वा मोटारसायकलीवर चालवणारा व त्याच्यामागे एक अशा फक्त दोन जणांनाच जाण्यास परवानगी आहे. इतकेच नव्हे तर कायद्यानुसार व सुरक्षिततेसाठी दोनही व्यक्तींनी हेल्मेट धारण करणे सक्तीचे आहे. पण लक्षात कोण घेतो, अशा थाटात सरकारला, नेत्यांना नावे ठेवमारे आपण, त्यांच्यावर तोंडसुख घेणारे आपण चलता है, टॅक्सी परवडत नाही असे सांगत अपघातांना निमंत्रण देत असतो.

अगदी छोटा अपघात झाला तर चार दिवस घरात बसण्यापेक्षा व दुखणं अंगावर काढत बसण्यापेक्षा हेल्मेट घातले किंवा दोनच जण स्कूटर वा मोटारसायकलवरून गेले तर काय बिघडते का, पण नाही... कायदेभंग हा जणू भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत आपल्यासाठीच आखून दिलेला मार्ग आहे, अशाच थाटात आपण सारे वावरत असतो. कायदे पाळल्याविना स्वातंत्र्य, त्याचे फायदे हवे आहेत, असे कसे. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. दुचाकीस्वाराने त्याच्यासह दोनपेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावरून दुचाकी चालवताना नेल्या तर त्याला तीन महिने शिक्षा किंवा ५०० रुपये दंड वा दोन्ही होऊ शकतो. हा दंड वा ही शिक्षा करण्याचे पोलिसांनी अजूनतरी मनावर घेतलेले दिसत नाही. मात्र लोकांनी ते मनावर घ्यायला काहीच हरकत नसावी..

 

टॅग्स :Automobileवाहनtwo wheelerटू व्हीलरAccidentअपघात