शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

मिथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी नीती आयोग आग्रही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 10:57 IST

वाहनांपासून होणारे प्रदुषण 40 टक्क्यांनी कमी होईल. तसेच मोठा फायदा म्हणजे 2030 पर्यंत 100 दशलक्ष डॉलर वाचतील.

ठळक मुद्देमिथेनॉलची उपलब्धी आणि वाहनांच्या इंजिनामध्ये बदल करणे आवश्यक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असतानाच भारतीयांची इंधनाची मागणी काही कमी होत नाहीय. यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळी खर्ची पडत असल्याने नीती आयोगाने पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर ठेवला आहे. सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळण्यात येते. मंत्रीमंडळाची परवानगी मिळाल्यास देशाचा 10 टक्के खर्च वाचणार आहे. नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारसोबत उच्च स्तरीय बैठक घेतली. यामध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. इथेनॉलची किंमत 42 रुपये प्रती लिटर आहे. तर मिथेनॉलची 20 रुपये प्रती लिटर. यामुळे इथेनॉलएवजी मिथेनॉलचा वापर केल्यास प्रती लिटरमागे 22 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी वाहनांच्या इंजिनांमध्येही बदल करावे लागणार आहेत. यासाठी वाहन क्षेत्राचीही सहमती आवश्यक असणार आहे. सध्या उत्पादित होणारी वाहने ही 18-20 टक्के इथेनॉल मिश्रीत इंधनावर धावू शकणारी आहेत. मिथेनॉलच्या वापरासाठी कंपन्यांना संशोधन करावे लागणार असल्याचे सियामचे महासंचालक विष्णू माथूर यांनी सांगितले.प्रामुख्याने इथेनॉल हे साखर कारखान्यांतून बनविले जाते. तर मिथेनॉल हे दगडी कोळशापासून. यामुळे उपलब्धी ही देखील महत्वाची ठरणार आहे. देशात साखर कारखाने मुबलक असल्याने इथेनॉल मुबलक प्रमाणावर उपलब्ध आहे. तसेच इथेनॉलचे प्रमाण 10 टक्क्यांवरून 20 ते 25 टक्क्यांवर नेण्याची मागणीही गेल्या काही काळापासून कारखानदारांकडून होत आहे. मात्र, दगडी कोळशाच्या खाणी कमी प्रमाणावर असल्याने मिथेनॉलचा मुबलक पुरवठा कसा होणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महत्वाचे म्हणजे सध्या केवळ पेट्रोलमध्येच मिथेनॉल मिसळण्याचा प्रस्ताव असला तरीही पुढे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यास मिथेनॉल मिश्रीत डिझेलची विक्रीही करण्यात येणार आहे.  

फायदे कोणते ? पेट्रोलमध्ये 15 टक्के मिथेनॉल मिसळल्यास पेट्रोलची किंमत 10 टक्क्यांनी कमी होईल. इंधनासाठी मध्यपूर्वेकडील देशांवरील अवलंबित्व कमी होऊन चीनकडून मिथेनॉलची खरेदी करता येईल. वाहनांपासून होणारे प्रदुषण 40 टक्क्यांनी कमी होईल. तसेच मोठा फायदा म्हणजे 2030 पर्यंत 100 दशलक्ष डॉलर वाचतील. 

किती इंधन लागते?भारत हा इंधन आयात करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे. वर्षाला 2900 कोटी लिटर पेट्रोल आणि 9 हजार कोटी लिटर डिझेल लागते. तसेच इतर पेट्रोलियम उत्पादनांसाठी मिळून 5 लाख कोटी लिटर इंधन आयात करावे लागते. 

मिथेनॉलची निर्मिती कुठे ?भारतामध्ये मिथेनॉलच्या निर्मितीसाठी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. यासाठी दोन्ही राज्यांनी कोळसा खाणी राखीव ठेवल्या आहेत. हे प्रकल्प यशस्वी झाल्यास सरकार मिथेनॉलचे उत्पादन सुरु करणार आहे. मात्र, तोपर्यंत किमान चार वर्षे चीनवर अवलंबून रहावे लागेल. तसेच 100 कोटी खर्च करून पुणे, हैदराबाद आणि त्रिची येथे संशोधन केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहनNIti Ayogनिती आयोगPetrolपेट्रोलpollutionप्रदूषण