'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:12 IST2025-06-26T16:11:26+5:302025-06-26T16:12:50+5:30

Biogas Vehicle Scheme: नितीन गडकरी यांनी भारतासाठी एक नवीन 'इंधन क्रांती' योजना सादर केली आहे, ज्याचा उद्देश पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व संपवणे आणि देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवणे आहे.

Biogas Vehicle Scheme: 'Now vehicles will run on bamboo, cow dung and organic waste', Nitin Gadkari explained the government's plan | 'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

Biogas Vehicle Scheme In India: भारत दरवर्षी कच्च्या तेलाच्या आयातीवर २२ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करत आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोच, शिवाय ऊर्जा सुरक्षाही धोक्यात येत आहे. अशातच आता, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी ही परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. ते एका योजनावर काम करत आहेत, ज्याद्वारे भारताला तेल आयातदारापासून ऊर्जा निर्यातदार बनवले जाईल.

सरकारची इंधन क्रांती योजना काय आहे?
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि ओहमियम इंटरनॅशनल यांच्यातील करारादरम्यान स्पष्ट केले की, भारत आता चार प्रमुख पर्यायी इंधनांवर वेगाने काम करत आहे. यामध्ये ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि फ्लेक्स-फ्युएल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) आणि आयसोब्युटेनॉल डिझेल मिक्स यांचा समावेश आहे. या धोरणाचे उद्दिष्ट भारतातील स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, इंधन खर्च कमी करणे आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा प्रणाली तयार करणे आहे, ज्यामुळे देश ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वेगाने वाटचाल करेल. 

हायड्रोजन ट्रकची चाचणी सुरू
त्यांनी असेही सांगितले की, ५०० कोटी रुपये खर्चून २७ हायड्रोजन ट्रकच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. हे ट्रक देशातील प्रमुख महामार्गांवर (दिल्ली-आग्रा, मुंबई-पुणे, जामनगर-वडोदरा, भुवनेश्वर-पुरी आणि विशाखापट्टणम-विजयवाडा. ) चालवले जात आहेत. या ट्रकमध्ये हायड्रोजन आयसीई आणि इंधन सेल तंत्रज्ञान दोन्ही वापरले जात आहे, ज्यामुळे ते पारंपारिक डिझेलवाहनांपेक्षा अधिक पर्यावरणपूरक बनतात. यासाठी देशभरात 9 हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन देखील स्थापित करण्यात आले आहेत.

दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

ग्रीन हायड्रोजन
नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनचे भारताचे ऊर्जा भविष्य म्हणून वर्णन केले. हे हायड्रोजन सौर आणि पवन ऊर्जेपासून तयार केले असून, त्यात कार्बन उत्सर्जन होत नाही, ज्यामुळे ते स्वच्छ इंधन बनते. गडकरी यांनी शास्त्रज्ञ, स्टार्टअप्स आणि खाजगी कंपन्यांना कचरा, बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी तंत्रज्ञानावर काम करण्याचे आवाहन केले. एनटीपीसी आणि काही खाजगी कंपन्यांनी या दिशेने आधीच प्रयोग सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

इथॅनॉल, फ्लेक्स-फ्युएल आणि बायोगॅस
गडकरींच्या योजनेत इथेनॉल आणि बायोगॅसलाही प्रमुख भूमिका देण्यात आली आहे. आता देशभरात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्यामुळे तेल आयातीत मोठी घट होईल. याशिवाय, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सारख्या फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड कारचे प्रोटोटाइप तयार करण्यात आले आहेत, जे लवकरच बाजारात सामान्य लोकांना उपलब्ध होतील. याशिवाय, ग्रामीण भागात कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्लांट उभारले जात आहेत, जे केवळ गावांना स्वच्छ इंधन पुरवणार नाहीत, तर शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत देखील देतील. ट्रक आणि जड वाहनांसाठी स्वच्छ इंधन पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी आयसोब्युटनॉल डिझेल मिक्सवरही चाचण्या केल्या जात आहेत.

भारताच्या ऑटो उद्योगात नवीन क्रांती
भारताचे ऑटोमोबाईल क्षेत्र आता जगातील तिसरे सर्वात मोठे बाजारपेठ बनले आहे. येत्या पाच वर्षांत भारताला जगातील नंबर १ ऑटोमोबाईल बाजारपेठ बनवण्याचे नितीन गडकरी यांचे ध्येय आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, देशातील मोठ्या ऑटो कंपन्या आता हायड्रोजन, इलेक्ट्रिक, इथेनॉल आणि हायब्रिड वाहनांमध्ये वेगाने गुंतवणूक करत आहेत.

Web Title: Biogas Vehicle Scheme: 'Now vehicles will run on bamboo, cow dung and organic waste', Nitin Gadkari explained the government's plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.